देशी वृक्षसंवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून गावात जनजागृतीही

मुंबई, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कोणत्याही मित्राचा वाढदिवस असो वा अन्य एखादा कार्यक्रम, त्या दिवशी राहुल भेट म्हणून एक रोपटेच देतात. तसेच देहू रोड येथील दत्तमंदिरात १०० वृक्षांची त्यांनी लागवड केली आहे. तसेच, तळवडे येथील राजा शिवछत्रपती विद्यालय, रुपीनगर येथील नवमहाराष्ट्र विद्यालय तसेच मावळातील अनेक गावांनाही वृक्षारोपणाने हरितकवच प्राप्त करुन दिले. देहू-आळंदी रस्त्यावर दोन तीर्थक्षेत्रांना जोडणार्या रस्त्यांवर दुतर्फा वृक्षारोपण करण्याचा त्यांचा संकल्प आहे. त्यातील देहूरोड, तळवडे या पहिल्या टप्प्यातील वृक्षारोपणाचे काम त्यांनी पूर्ण केले आहे. तसेच पुरंदर तालुक्यातील हिवरे गावात वन विभागाने लागवड केलेल्या रोपांचे पालकत्वही त्यांनी स्वीकारले आहे. त्यासाठी डोंगरावर पाण्याच्या टाक्याही त्यांनी बसवल्या. तसेच, गावातील विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून वाचनालय आणि अभ्यासिका उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. रोपवाटिका कार्यशाळा, रोपनिर्मिती कार्यशाळा व देशी वृक्षसंवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी गावात जनजागृतीही केली. २०१४ साली झाडांची मोफत रोपवाटिका सुरु केली. तसेच, दिघी आणि चिंचवड येथेही अशीच एक रोपवाटिका कार्यरत करण्यात आली. या माध्यमातून आतापर्यंत २५ हजारांहून अधिक रोपे तयार केल्याचे राहुल सांगतात.Public awareness in the village through indigenous tree conservation project
ML/KA/PGB
27 Feb. 2023