या राज्यात खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना करावे लागणार १० तास काम

अमरावती, दि. ११ : आंध्र प्रदेश सरकारने खासगी कंपन्या आणि कारखान्यांमध्ये कामकाजाचे तास ९ वरून १० तासांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे राज्यभरात कामगार संघटनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
नवीन कायद्यातील महत्त्वाचे बदल
कामाचे तास: ९ तासांऐवजी आता १० तास प्रतिदिन
ब्रेक वेळ: ५ तासांनंतर १ तास विश्रांतीऐवजी आता ६ तासांनंतर ब्रेक
ओव्हरटाईम मर्यादा: ७५ तासांवरून वाढवून १४४ तास प्रति तिमाही
रात्रीच्या शिफ्टमध्ये महिलांना परवानगी, जर सुरक्षा आणि वाहतूक सुविधा पुरवण्यात आल्या तर
सरकारचे म्हणणे काय?
“Ease of Doing Business” धोरणाचा भाग म्हणून हा निर्णय घेतल्याचे माहिती व जनसंपर्क मंत्री के. पार्थसारथी यांनी सांगितले
उद्योगांना आकर्षित करणे, गुंतवणूक वाढवणे आणि रोजगार निर्मिती हे उद्दिष्ट
मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सांगितले की, “हे बदल कामगारांसाठी लवचिकता आणि दीर्घकालीन विकास साधतील”
कामगार संघटनांचा तीव्र विरोध
“हे धोरण कामगारांना गुलाम बनवणारे आहे”, असा आरोप CPI आणि CPM नेत्यांनी केला आहे
“अधिक तास, तीच पगार, कमी आयुष्य”, असा सोशल मीडियावर संताप
जुलै ९ रोजी देशव्यापी निदर्शने जाहीर, कामगार हक्कांवर गदा आणल्याचा आरोप