नव्या संसद भवनात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचे पहिले भाषण, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

 नव्या संसद भवनात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांचे पहिले भाषण, जाणून घ्या महत्त्वाचे मुद्दे

नवी दिल्ली, दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणानं सुरु झालं. द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभेच्या सदस्यांना संबोधित केलं. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या गेल्या १० वर्षांतील प्रमुख कामांचा उल्लेख केला. द्रौपदी मुर्मू यांनी गेल्या वर्षात भारतानं ऐतिहासिक यश मिळवल्याचं म्हटलं आहे.राष्ट्रपती म्हणाल्या की, गेले वर्ष भारतासाठी ऐतिहासिक कामगिरीने भरलेले होते. महिला आरक्षण कायदा केल्याबद्दल त्यांनी खासदारांचे अभिनंदनही केले. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक पदके, चांद्रयान-3 चे यश, राम मंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण झाल्याचा उल्लेख त्यांनी केला.

राष्ट्रपतींनी राम मंदिराचा उल्लेख करताच उपस्थित खासदारांनी त्यांचे अभिनंदन केले. शतकानुशतके राम मंदिराची आकांक्षा होती, ती यावर्षी पूर्ण झाली आहे, असे त्या म्हणाल्या. राष्ट्रपतींच्या मते, गुलामगिरीच्या काळात बनवलेले कायदे आता इतिहासाचा भाग बनले आहेत. त्या म्हणाल्या की, सरकारने तिहेरी तलाकची वाईट प्रथा बंद करण्यासाठी कठोर कायदेशीर तरतुदी केल्या आहेत.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, सरकारने 34 लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. DigiLocker मुळे आयुष्य सोपे होत आहे. भारतात, जगातील 46% व्यवहार डिजिटल होऊ लागले आहेत. वनविभागाच्या क्लिअरन्सला आता 75 दिवस लागतात. रेल्वेच्या क्षेत्रातही देशाने नवे आयाम गाठले आहेत. पायाभूत सुविधांमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली आहे. विकसित भारताची भव्य इमारत चार खांबांवर उभी राहू शकते. ही युवा शक्ती, महिला शक्ती, शेतकरी शक्ती आणि गरीब वर्ग आहेत.

राष्ट्रपती दोपाद्री मुर्मू म्हणाल्या की, देशातील 10 कोटींहून अधिक लोकांना कायमस्वरूपी घरे मिळाली आहेत. 11 कोटी ग्रामस्थांपर्यंत नळाचे पाणी पोहोचले आहे. कोरोनाच्या काळात 80 कोटी देशवासीयांना मोफत रेशन दिले गेले. आता ही योजना पुढील 5 वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. यासाठी आणखी 11 लाख कोटी रुपये खर्च केले जातील, असा अंदाज आहे.

राष्ट्रपती म्हणाल्या, माझ्या सरकारने एक देश-एक कर कायदा आणला. बँकिंग व्यवस्था मजबूत केली. बँकांचा NPA 4% पर्यंत कमी झाला आहे. एफडीआय पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे. सुशासन आणि पारदर्शकतेमुळे आर्थिक सुधारणा झाली आहे. मेक इन इंडिया ही सर्वात मोठी मोहीम बनली आहे. संरक्षण क्षेत्रातील खासगी कंपन्यांचा सहभाग वाढला आहे. आज आपण खेळणी निर्यात करतो. व्यवसाय करण्याची सुलभतादेखील सुधारली आहे. देशात व्यवसायासाठी चांगले वातावरण आहे. डिजिटल इंडियामुळे व्यवसाय करणे सोपे झाले आहे. डिजिटल इंडिया ही देशाची मोठी उपलब्धी ठरली आहे. आज जगातील इतर देशदेखील UPA च्या माध्यमातून व्यवहाराची सुविधा देत आहेत. खासगी क्षेत्राच्या क्षमतेवर सरकारचा विश्वास आहे. 2 कोटी बनावट लाभार्थी प्रणालीतून काढून टाकण्यात आले आहेत.

SL/KA/SL

31 Jan. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *