तीन मान्यवरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ जाहीर

 तीन मान्यवरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ जाहीर

नवी दिल्ली,दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : केंद्र सरकारकडून मागील आठवड्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्याआदी बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. त्यानंतर आज देशाच्या विकासात महत्त्वाच्या योगदाने देणाऱ्या तीन मान्यवरांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील दोन मान्यवरांनी देशाचे पंतप्रधानपद भूषवले होते. चौधरी चरण सिंह, नरसिंह राव आणि एमएस स्वामीनाथन यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकापाठोपाठ एक तीन ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांची थोडक्यात माहिती

चौधरी चरण सिंह (माजी पंतप्रधान)

  • जन्म उत्तरप्रदेशच्या मेरठ जिल्हयातील नूरपूर येथे एका मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात झाला.
  • 1937 मध्ये छपरोली येथून उत्तरप्रदेश विधानसभेसाठी निवड. त्यांनंतर त्यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी काम केलं.
    शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले.
  • 1979 मध्ये ते देशाची अर्थमंत्री आणि उपपंतप्रधान बनले. त्याच वर्षी त्यांनी राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक म्हणजे नाबार्डची स्थापना केली.
  • 28 जुलै 1979 रोजी चौधरी चरण सिंह समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने देशाचे पंतप्रधान बनले.
  • चौधरी चरण सिंह यांना वाचणाची आणि लिखाणाची आवड होती. त्यांनी जमीनदारी निर्मूलन, भारतातील गरीबी व त्यावरील उपाय, शेतकऱ्यांची मालकी की शेतकऱ्यांसाठी जमीन, प्रिवेन्शन ऑफ डिविजन ऑफ होल्डिंग्स बिलो ए सर्टन मिनिमम, को-ऑपरेटीव फार्मिंग एक्स-रेड या पुस्तकांचे लिखाण केलं.
  • पी व्ही नरसिंह राव (माजी पंतप्रधान)
  • भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासात अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान
  • 1991 ते 1996 या दरम्यान नरसिंहरराव देशाचे नववे पंतप्रधान होते.
  • 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था डबघाईला आली असताना, देशावर आर्थिक संकट आलं असताना त्यांनी नव्या आर्थिक सुधारणा हाती घेतल्या.
  • त्यावेळचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंह यांच्या साथीने त्यांनी 1991 साली भारतीय अर्थव्यवस्था खुली केली आणि जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाचे धोरण राबवले.
  • एमएस स्वामीनाथन
  • 1960 च्या दशकात जेव्हा नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारतात मोठ्या प्रमाणात दुष्काळाची शक्यता होती, तेव्हा उच्च उत्पादन देणार्‍या गहू आणि तांदळाच्या जाती भारतात आणल्याबद्दल आणि विकसित करण्यासाठी त्यांना प्रथम जागतिक अन्न पुरस्कार देण्यात आला होता.
  • स्वामिनाथन यांना 1987 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित
  • चेन्नई येथे एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली.
  • अनेक पुरस्कारांव्यतिरिक्त, स्वामिनाथन हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार (1971) आणि अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार (1986) प्राप्तकर्ते आहेत.
  • त्यांची मुलगी डॉ सौम्या स्वामीनाथन यांनी 2019-2022 पर्यंत जागतिक आरोग्य संघटनेत (WHO) मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम केले. त्यांनी जानेवारीच्या सुरुवातीला MSSRF चे अध्यक्षपद स्वीकारले आहे.

SL/KA/SL

9 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *