महाप्रसादातून झाली विषबाधा, पन्नास जण रुग्णालयात

 महाप्रसादातून झाली विषबाधा, पन्नास जण रुग्णालयात

नांदेड, दि. १६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे अन्नातून विषबाधा झाल्यामुळे 50 हून अधिक व्यक्तींवर नायगाव येथील शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.

नायगाव तालुक्यातील लालवंडी येथे आंबील महाप्रसादातून झालेल्या विषबाधेतून पन्नास हून अधिक लोकांना मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास झाला. त्यानंतर नायगावचे शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी या रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान नायगावच्या लालवंडी इथे एका घरगुती कार्यक्रमात शेतात अंबील प्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . हा प्रसाद खालल्यानंतर त्यातून 50 हून अधिक लोकांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न आहे.

ML/ML/SL
16 May 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *