डाळिंबाची बाग वाचवण्यासाठी कुसुम सोलर योजनेचा फायदा.

जालना दि १४–जिल्ह्यातील अंबड तालुक्यात याही वर्षी भीषण पाणी टंचाई आहे.
विहिरींनी तळ गाठल्याने त्यातच विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना पिकांसाठी पाण्याचे नियोजन करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.रात्री बेरात्री लाइट आली की शेतात जाऊन मोटार चालू करण्यासाठी पळावे लागत आहे.दिवसभर उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने मोसंबी,
डाळिंबाच्या बागा मान टाकू लागल्या आहेत.
जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील डोमेगाव येथील शेतकरी प्रवीण काळबांडे यांना मात्र या त्रासातून मुक्ती मिळाली आहे.प्रधानमंत्री कुसुम सोलर योजनेतून त्यांना साडेसात(7.50 kw) किलोवॅट चा सोलारपंप मिळाल्यामुळे त्यांची फळबागेला पाणी देण्याचे काम दिवसा होऊ लागले आहे.वीज खंडित होत असल्याने होणारा त्रास कुसुम सोलर योजनेने बंद झाल्याने यावर्षी त्यांची डाळिंबाची बाग छान बहरली आहे. पाणी टंचाई असल्याने आणि उन्हाचा पारा 40 अंशावर पोहचल्याने आहे तेव्हढ्या पाण्याचे नियोजन करून,
डाळिंबाच्या झाडावर क्रॉप कव्हर टाकून त्यांनी आपली डाळिंबाची बाग वाचवली आहे.

सकाळी ऊन सुरू झाले की त्यांचा सोलर पंप चालू होतो त्यामुळे डाळिंबाला पाणी देता येत असल्याने प्रवीण काळबांडे समाधान व्यक्त करतात. हा सोलर पंप मोबाईलवरून हाताळता येत असल्याने गावाला गेले तरी मोबाईल वरून पाणी चालू बंद करता येणे शक्य झाल्याने त्यांना आता शेतात येण्याची गरज कमी झाली आहे.
पंतप्रधान कुसुम सोलर योजनेमुळे आपले जीवन आनंदित झाल्याने ते पंतप्रधान नरेंद मोदी आणि केंद्र सरकारचे आभार व्यक्त करतात.
या प्रचंड उन्हाळ्यात सोलर पंप मुळे पाण्याचे नियोजन करता आल्याने यावर्षी डाळिंबाची बाग वाचवू शकल्याने त्यांच्या चेहेऱ्यावर समाधान दिसून येत आहे. ML.MS