पेपरफुटी प्रतिबंधक कायदा याच अधिवेशनात

मुंबई दि १— राज्यात एक लाखांहून अधिक तरुणांना कोणतीही अडचण न येता गेल्या दोन वर्षांत नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, एखादा अपवाद वगळता ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडली तरीही पेपरफुटी संदर्भातील कायदा याच अधिवेशनात आणला जाईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. पेपर फुटीचे फेक नरेटिव्ह पसरविणाऱ्या वेबसाईट वर गुन्हा दाखल केला जाईल असं ते म्हणाले. याबाबतचा प्रश्न बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला होता. राजेश टोपे, आशिष शेलार , रोहित पवार , भास्कर जाधव आदींनी उप प्रश्न विचारले.
तलाठी भरती प्रक्रियेत कोणताही गोंधळ नव्हता तरी गदारोळ झाल्यानं ती प्रक्रिया नव्याने करत आहोत , पेपरफुटी चे प्रकार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रावरील कर्मचारी आयत्या वेळी ठरविले जातील आणि त्यांच्यावरील निरीक्षक नेमण्यात येतील असं ही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
सरकारनं ७५ हजार पद भरती करण्याचं जाहीर केलं होतं प्रत्यक्षात आजवर ५७,४५२ जणांना नियुक्त्या दिल्या आहेत. १९,८५३ जणांच्या परीक्षा पूर्ण होऊन निकाल लागले आहेत. त्यांना लवकरच नियुक्ती दिली जाईल अशा एकूण ७७,३०५ नोकऱ्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत दिल्या आहेत, हा देश पातळीवरचा विक्रम आहे. आणखी ३१, २०१ पद भरती ची कारवाई सुरू आहे. याशिवाय गट क वर्गाच्या जागा आता mpsc मार्फत भरल्या जातील अशी माहिती फडणवीस यांनी या प्रश्नाच्या उत्तरात दिली.