पंढरपूर ते रायगड निघाली स्वराज्य यात्रा
सोलापूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्राच्या खोकेधरी सरकारला सदबुद्धी दे आणि जनतेला हिंमत दे….. जेणेकरून लोकांच्या समस्या दूर होतील. असे साकडे विठूरायाकडे आम आदमी पार्टीच्या प्रीती मेनन शर्मा यांनी घातले. शेतकरी ,कष्टकरी अन् नागरिकांच्या प्रश्नाबाबत या सरकारला कुठल्याही प्रकारची दयामाया नाही. त्यासाठीच आता आम् आदमी पार्टी रस्त्यावरची लढाई लढत आहे. याचाच भाग म्हणून पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा आपने काढली , असून त्याचा शुभारंभ आज पंढरपूर येथे करण्यात आला. पंढरपुरातून सुमारे शंभरहून अधिक लोक यात्रेमध्ये सहभागी होऊन रायगडकडे रवाना झाले आहेत. ही यात्रा सुमारे नऊ दिवसाचा प्रवास करून सहा जून रोजी रायगड याठिकाणी जाऊन पोहोचणार आहे.
ML/KA/PGB 28 May 2023