संत्रा उत्पादकांसाठी 12 कोटी 38 लाखांची मदत जाहीर
नागपूर, दि. 6 :
वर्धा जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसामुळं झालेल्या नुकसानासाठी सरकारनं विशेष पॅकेज जाहीर केलं आहे. आर्वी, कारंजा व आष्टीतील शेतकऱ्यांना फडणवीस सरकारची मदत जाहीर झाली आहे. 12 कोटी 38 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी वर्धा व नागपूर विभागीय आयुक्तांच्या प्रस्तावानुसार मदत जाहीर करण्यात आली आहे. 315 गावांतील 8 हजार 999 शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे. 5 हजार 506 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले होते. डीबीटी द्वारे थेट बँक खात्यात रक्कम जमा होणार आहे. मागील वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बसला होता. त्यांच्या पूर्ण बागाच उद्धवस्थ झाल्या होत्या. त्यामुळं वर्धा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडले होते. या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत दिली जाईल असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.
SL/ML/SL