गारपिटीने 500 हेक्टर क्षेत्रातील कांदा,हरभरा, गव्हाचे नुकसान

अमरावती, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्यातील काही गावांमध्ये काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्याच्या पावसासह जोरदार गारपीट झाली. यामध्ये धामणगाव, तळेगाव दशासर भागात जोरदार फटका बसला. गारपीटीमुळे जवळपास 500 हेक्टर क्षेत्रातील ,हरभरा, गहू, तुर, कांदा,संत्रा आणि इतर भाजीपाला फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारठीने हिरावला गेला आहे. शेतकरी पुन्हा संकटात प्रशासनाकडून पंचनामे व्हावे आणि तातडीने मदत मिळावी शेतकऱ्यांची मागणी आहे. Onion, gram, wheat damage in 500 hectares area due to hailstorm
ML/KA/PGB
11 Feb 2024