आता वसई ते भाईंदर करता येणार बोटीने प्रवास
आता वसई ते भाईंदर करता येणार बोटीने प्रवास
मुंबई, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डामार्फत वसई खाडीतील वसई ते भाईंदरला जोडणारी रो-रो प्रवासी फेरी सेवा 20 फेब्रुवारी 2024 पासून प्रायोगिक तत्त्वावर सुरू होणार आहे. रोरो बोटीचे सुरक्षित आणि सुलभ नौकानयन, प्रवासी आणि वाहनांचे सुरळीत चढणे आणि उतरणे आणि योग्य नौकानयन मार्गाची खात्री झाल्यानंतर, फेरी सेवेचे औपचारिक उद्घाटन केले जाईल. बहुप्रतीक्षित रो-रो फेरी सेवा भाईंदर आणि वसई शहरांना जलवाहतुकीद्वारे जोडेल.
मेसर्स सुवर्णदुर्ग शिपींग अँड मरीन सर्व्हिसेस प्रा.लि. या कंपनीस ही रो-रो फेरीबोट सेवा चालविण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली असून, एकाच फेरीत १०० प्रवासी आणि ३३ गाड्या वाहून नेण्याची फेरीबोटीची क्षमता आहे. कोकण किनारपट्टीवरील राजपुरी, बाणकोट, दाभोळ आणि जयगड खाडींदरम्यान रो-रो फेरी सेवा चालवण्याचा कंपनीला व्यापक अनुभव आहे. वसई ते भाईंदर फेरी सेवेसाठी तिकिटांचे दर सध्या तीन महिन्यांसाठी चाचणी तत्त्वावर निश्चित करण्यात आले आहेत.
असे आहे तिकीट दर
मोटारसायकल – रु. ६०/-
तीन चाकी रिक्षा – रु. १००/-
चारचाकी वाहन – रु. १८०/-
प्रवासी प्रौढ (१२ वर्षावरील) – रु. ३०/-
प्रवासी लहान – रु. १५ /-
Now you can travel from Vasai to Bhayandar by boat
ML/KA/PGB
17 Feb 2024