आता भारतातूनही घेता येईल कैलास पर्वताचे दर्शन

 आता भारतातूनही घेता येईल कैलास पर्वताचे दर्शन

नवी दिल्ली,दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : भगवान शंकराचे निवासस्थान म्हणून मान्यता असलेल्या कैलास पर्वताचे दर्शन घेण्यासाठी भारतीय भाविकांना अतिशय खडतर प्रवास करावा लागतो. यासाठी चीनची परवानगी घेऊन असलेल्या तिबेटमध्ये प्रवेश करावा लागतो. येथील हवामान तर खडतर आहेच पण कायदेशीर परवानग्या मिळवण्यासाठी देखील कसरत करावी लागते. त्यामुळे अनेक भाविकांना कैलासाच्या दर्शनापासून वंचित रहावे लागले आहे. मात्र आता कैलासाचे दर्शन आपल्या देशातून घेणे शक्य होणार आहे. उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील 18 हजार फूट उंच लिपुलेख पर्वतावरून कैलास पर्वत स्पष्टपणे दिसतो. येथून पर्वताचे हवाई अंतर ५० किमी आहे.

हा नवीन दर्शन मार्ग स्थानिक ग्रामस्थांनी शोधून काढला आहे. ग्रामस्थांच्या माहितीवरून अधिकारी व तज्ज्ञांचे पथक पोहोचले, रस्त्याचा नकाशा, लोकांच्या राहण्याची व्यवस्था, दर्शनस्थळापर्यंत पोहोचण्याचा मार्ग व इतर व्यवस्थांचे सर्वेक्षण केले. ते आपला अहवाल पर्यटन मंत्रालयाला सादर करतील. त्यानंतर या नवीन दर्शन पॉइंटवर काम सुरू होईल. तज्ज्ञांच्या टीमचा भाग असलेल्या कृती चंद यांनी सांगितले की, लिपुलेखचा डोंगर जिथून दिसतो तो नाभिधंगपासून फक्त 2 किमी वर आहे.येथून 4-5 दिवसांचा प्रवास करून कैलास पर्वताला भेट देता येते. भाविकांना रस्त्याने धारचुला व बुढीमार्गे नाभिडंग गाठावे लागणार आहे. यानंतर दोन किलोमीटरची चढण पायी करावी लागेल.

सध्या कैलास यात्रा 3 वेगवेगळ्या महामार्गांनी केली जाते. पहिला- लिपुलेख पास (उत्तराखंड), दुसरा- नाथू पास (सिक्कीम) आणि तिसरा- काठमांडू. या तीन मार्गांना किमान 14 आणि कमाल 21 दिवस लागतात. 2019 मध्ये 31,000 भारतीय तीर्थयात्रेला गेले होते, त्यानंतर चार वर्षे तीर्थयात्रा बंद होती.हा नवीन रस्ता तयार झाल्यानंतर दिल्लीहून हा प्रवास 4-5 दिवसांत पूर्ण करता येईल. दरम्यान पर्यटन विभागाचे म्हणणे आहे की, जुन्या लिपुलेखपर्यंत जाण्यासाठी 2 किलोमीटर चढून जावे लागते, जे सोपे नाही. इथे जाण्यासाठी रस्ताही बनवता येईल. स्नो स्कूटरच्या साहाय्याने भाविकांना डोंगराच्या माथ्यावरही दर्शनासाठी नेले जाऊ शकते. तज्ज्ञांच्या मते, पिथौरागढमध्ये हा नवीन मार्ग तयार झाल्यानंतर दिल्लीहून चार ते पाच दिवसांत कैलास-मानसरोवर यात्रा पूर्ण होऊ शकते. भाविकांना रस्त्याने धारचुला व बुढीमार्गे नाभिडंग गाठावे लागणार आहे. यानंतर दोन किलोमीटरची चढण पायी करावी लागेल.

१९६२ मध्ये भारत आणि चीनमध्ये युद्ध झाले तेव्हा चीनने भारताचे कैलास आणि मानसरोवर ताब्यात घेतले. आता इथे जाण्यासाठी चिनी टूरिस्ट व्हिसा घ्यावा लागेल. यामुळे कैलासला जाणे सोपे नाही.आता शोधण्यात आलेल्या या नवीन मार्गाचा अवलंब केल्यास कैलासाचे दर्शन घेणे भाविकांना काहीसे सुसह्य होईल.

SL/KA/SL

30 June 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *