एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

 एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  सांगलीतल्या जत तालुक्यामधील ग्रामपंचायतींनी 2012 मध्ये पाणी प्रश्नावरून कर्नाटकात सामील होण्याचा ठराव मंजूर केला होता. परंतु म्हैसाळच्या सुधारित पाणी योजनेत या गावांचा समावेश करण्याची योजना महायुतीच्या काळात तत्कालीन सिंचन मंत्री गिरीष महाजन यांनी आखली होती आणि त्यामध्ये या गावांचा समावेश होणार आहे त्यामुळे एकही गाव कर्नाटकात जाणार नाही असे उपमुख्मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.Not a single village will go to Karnataka

करोना महामारी मुळे मागील सरकारच्या काळात त्या योजनेला मान्यता देण्यात आली नाही. आता या योजनेला तात्काळ मान्यता देण्यात येणार असून या संदर्भातील सर्व निधी केंद्र शासनाकडून मिळणार आहे. नुकतेच कर्नाटक सीमावर्ती भागातील लोकांना मदत करण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी काल एका बैठकीत घेतली होती . त्यामुळे जत तालुक्यासंदर्भात वक्तव्य कर्नाटकांच्या मुख्यमंत्र्यांनी केल असावं. पण महाराष्ट्र बाहेर एकही गाव जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. बेळगाव, कारवार, निपाणी ही गावे महाराष्ट्रात परत सामील करण्यासाठी आमचा न्यायालयीन लढा चालू असल्याचे फ़डणवीस यांनी स्पष्ट केले.

ML/KA/PGB
23 Nov .2022

 

 

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *