निलेश साबळेच्या हसताय ना… ने तीन महिन्यातच घेतला निरोप

 निलेश साबळेच्या हसताय ना… ने तीन महिन्यातच घेतला निरोप

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : छोट्या पडद्यावरील सर्वांचाच आवडता कार्यक्रम चला हवा येऊ द्या काही दिवसांपूर्वीच बंद झाला. पण त्यानंतर अभिनेता निलेश साबळे हा ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा नवा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आला होता. पण आता कलर्स मराठीवरील ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ हा कार्यक्रमही अवघ्या तीनच महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे या कार्यक्रमाचं पहिलं पर्व होतं आणि लवकरच दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईल असंही सांगितलं जात आहे. तर कलर्स मराठी वाहिनीवर आता ‘बिग बॉस मराठी’ चा पाचवा सीझन लवकरच भेटीला येणार आहे. बिग बॉससाठी आता जुने शो बंद केले जात आहे. त्यात एक हसताय ना.. हसायलाच पाहिजे हा शो आहे. ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’ या शोमध्येही भाऊ कदम आणि ओंकार भोजणे हे दोघेही स्त्री वेशात दिसून आले. ही बाबा प्रेक्षकांना फार आवडली नाही. त्यावरून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. पहिल्या प्रोमोपासूनच प्रेक्षकांनी नवीन शोची तुलना चला हवा येऊ द्यासोबत केली होती. दरम्यान बिग बॉस संपल्यानंतर ‘हसताय ना.. हसायलाच पाहिजे’ या शोचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो, अशाही चर्चा सुरू आहेत.

ML/ML/PGB 22 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *