नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील घडामोडींचा भविष्य वेध

 नवीन संवत्सर कसे राहील ? देशातील घडामोडींचा भविष्य वेध

मुंबई, दि. 30 (जितेश सावंत) :दिनांक ०८ एप्रिल २०२४ रोजी रात्री ११ वाजून ५१ मिनीटांनी अमावास्या संपत असून.दिनांक ०९ एप्रिल २०२४ रोजी गुढीपाडव्यापासून नूतन संवत्सरास म्हणजेच शालिवाहन शके १९४६ ला प्रारंभ होत आहे. नवीन संवत्सराचे नाव “क्रोधीनाम” आहे.

संवत्सराचे फळ- या वर्षात जनता क्रोध,लोभ,स्वार्थ या भावनांनी तसेच रोगांनी ग्रासेल
नवीन वर्षाची पत्रिका ही धनु लग्नाची आहे तृतीय स्थानी मंगळ,शनी, चतुर्थ स्थानी रवि,चंद्र ,शुक्र,राहू,नेपच्यून, पंचम स्थानी बुध,गुरु,हर्षल ,
दशम स्थानी केतू आणि द्वितीय स्थानी प्लूटो असे ग्रह आहेत.

आगामी वर्ष आपल्या देशाला कसे जाईल ?

लोकांची मानसिकता सुधारेल पिकांचे उत्पादन वाढेल. अन्नधान्यात वाढ होईल.चांगली पर्जन्यवृष्टी त्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ ,पाणी योजनांना यश मिळेल. या वर्षी जन्मदर वाढताना दिसेल.

उद्योगधंद्यात वाढ होईल, खास करून वाहन,वस्त्र आणि बांधकाम उद्योगासाठी अनुकूल. देशात मोठ्या इमारती/घरे बांधली जातील. नवीन सार्वजनिक/सरकारी इमारती,रस्ते बांधले जातील. या वर्षी नवी तसेच अत्यानुधिक /उंची वाहनांची निर्मिती होईल.

येणाऱ्या वर्षात विरोधी पक्षाचे बळ वाढेल तसेच सताधारी पक्षाच्या कटकटी, त्रास वाढतील, सरकारी पक्षाच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल. विरोधी पक्षाच्या मनासारख्या घटना घडतील. काही राज्यात मध्यावधी निवडणुकीची संभावना. पोटनिवडणुकीत सत्ताधारी पक्षाला अपयश. काही वेळेला सरकार बळाचा वापर करताना दिसेल प्रसंगी निष्ठूर होताना दिसेल. मंत्रिमंडळातील अंतर्गत भांडणे उफाळून येतील. काही राजकीय पक्षांचे अस्तित्व धोक्यात येईल. देशातील किंवा राज्यातील सरकारमध्ये मोठ्या प्रमाणात अस्थिरता/अशांतता जाणवेल. उच्च अधिकाऱ्यांवर संकटे येईल.

मे नंतर या देशाच्या राजकारणात मुलभूत/मोठे बदल पाहावयास मिळेल.येणाऱ्या काळात देशात आणि राज्यात खास करून सरकार /मंत्रिमंडळामध्ये मध्ये मोठे बदल ,तसेच भावी राजकारणाच्या परिवर्तनाची नांदी होताना दिसेल. हे वर्ष
देशाकरिता चांगले राहील सीमेवर युद्धाचे प्रसंग निर्माण होतील परंतु सीमेवरील युद्धात यश मिळेल त्याचप्रमाणे खेळाडूंना यश मिळेल.

ह्या वर्षी देखील देशात नैसर्गिक आपत्ती/संकटे येतील
(Natural disasters) या वर्षी हवामानात विचित्र बदल होताना दिसतील अवकाळी पाऊस/भूकंप/वादळे/चक्रीवादळाचा फटका बसेल खाणी/विहिरी/तलाव/इमारती यात अपघात तसेच भूकंपाची शक्यता. स्फोटाच्या घटना घडतील. जंगलांना आगी लागण्याचे प्रकार घडतील. भूकंपामुळे घरांचे/इमारतीचे नुकसान. जमीन/रस्ता खचण्याच्या/भेगा पडण्याच्या घटना पावसामुळे दलदल निर्माण होईल.

रेल्वेचे अपघात,रेल्वेत स्त्रियांवर अत्याचाराच्या घटना घडण्याची शक्यता तसेच आग लागणे,
आर्थिक हानी तसेच रस्त्यावरील अपघात वाढतील.तसेच प्रवासात व्यत्यय येईल. प्रसारमाध्यमातील वादविवाद वाढतील.एखादी बातमी किंवा अँकर कारणीभूत ठरेल.
प्रसारमाध्यमांसाठीचे नवीन कायदे निर्माण होतील. प्रवासी वाहतूकीत बंद,निदर्शने तसेच इतर कारणांमुळे खंड पडेल( रेलवे,एसटी,रस्ते वाहतूक), विमान अपघात.
कर्मचाऱ्यांची आंदोलने/ संप/उद्रक निदर्शने/तोडफोड/रास्ता रोको/हिंसात्मक प्रदर्शने असे प्रकार पाहावयास मिळतील.

गुप्त शत्रूंच्या मार्फत देशाची अर्थव्यवस्था कमजोर करण्याचे प्रयत्न होतील.काळाबाजार,
मोठे घोटाळे,तस्करी यामुळे अर्थव्यवस्था अस्थिर होईल.
काही निरर्थक वादामुळे समाजामध्ये परस्परांमध्ये तेढ ,वादविवाद निर्माण होतील तसेच काही अनिष्ठ ,अप्रिय घटनांमुळे सरकार आणि समाजाला कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ येईल.

खेळाडू/लहान मुले/कलाकार/सिनेमा/संगीत/नाटक/ मनोरंजनाची ठिकाणे या सगळ्याकरिता उत्तम कालावधी.कलाकार/खेळाडू.यांना,यश,प्रसिद्धी तसेच पुरस्कार मिळतील.
परंतुकलाकार/साहित्यिक, पत्रकार/वक्ता/लेखक/प्रकाशक/चित्रकार यांच्यावर कायदेशीर कारवाईची शक्यता तसेच मृत्यूयोग. नाट्यक्षेत्रात/रंगमंच वाद तसेच कायदेशीर लढाया /केसेस होताना दिसतील.

कला,साहित्य,लेखन या क्षेत्रातील नवीन लोकांना/उदयोन्मुख कलाकारांसाठी उत्तम,बालकलाकारांना प्रसिद्धीचा काळ, लहान मुलांसाठी यशाचा काळ. नवीन प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांना वाव मिळेल.
शिक्षणसंस्थांमध्ये चांगले बदल होताना दिसतील. नवीन शाळा/कॉलेज यांची स्थापना होताना दिसेल. परंतु त्याचबरोबर या क्षेत्रातील वादविवाद /भांडण,तंटे चव्हाट्यावर येतील.

या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहील. भारतातील अनेक राज्यात अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य परिस्थिती राहण्याची शक्यता पण त्याचबरोबर पावसात खंड देखील पडताना दिसेल.
शेअर मार्केट करीता उत्तम –
या वर्षी मार्केटमध्ये तेजी होईल. मार्केट नवीन विक्रमी उच्चांक देखील गाठू शकेल.परंतु पंचमातील हर्षला मुळे मोठ्या प्रमाणात चढउतार ,अस्थिरता देखील जाणवेल. बऱ्याच वेळेला गुंतवणूकदारांचे अंदाज चुकतील. त्यामुळे नुकसानीला सामोरे जावे लागेल.

जितेश सावंत

के. पी. विशारद , नक्षत्र सम्राट, वास्तू तज्ञ (Astro Vastu Consultant) शेअर बाजार (Stock Market) / सायबर कायदा(cyber law) तज्ञ

jiteshsawant33@gmail.com

GS/KA/PGB 30 March 2024

Piyusha Bandekar

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *