केंद्राच्या धर्तीवर राज्यात सुरू होणार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना

Farmer
मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र सरकार लवकरच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या (PM Kisan) धर्तीवर ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) सुरू करत आहे. याद्वारे शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. मे २०२३ अखेरीस पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
पीएम किसान योजनेतील लाभार्थीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी पात्र असतील. ज्या शेतकरी लाभार्थींनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी संलग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ करून घ्यावे. मेअखेरीस तथा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी माहिती
कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.
१ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल. लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी.
केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष आहेत. प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.
मात्र, पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे.
राज्यातील १२ लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही. अशा शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते लिंक करून घ्यावे; अन्यथा त्यांना या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत.
SL/KA/SL
11 May 2023