नामदेव महाराजांच्या दिंडीचे परभणी जिल्ह्यात आगमन

परभणी दि २१ — “श्री संत शिरोमणी नामदेवांनी भागवत धर्माची पताका लाविली” त्यांच्या भक्ती, कीर्तन, अभंग, आणि सामाजिक समतेचे कार्य करून भगवंताच्या प्रेमभक्तीचा झेंडा समाजात उभारला आणि सर्वसामान्य जनतेला तो मार्ग दाखवत महाराष्ट्रासह पंजाब पर्यंत भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारे संत शिरोमणी नामदेव महाराजांचे जन्मगाव असलेल्या नर्सी येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या 30 वर्षाची परंपरा असलेल्या पालखीचे आगमन परभणी जिल्ह्यात आगमन झाले आहे. नांदगाव आणि श्री क्षेत्र त्रिधारा येथे स्वागत करण्यात आले.
यावेळी नामदेव,मुक्ताबाई आणि ‘ज्ञानबा तुकाराम’ च्या जयघोष करत परभणी शहराच्या दिशेने निघाली आहे, आज परभणी शहरात मुक्कामी थांबणार आहे आणि उद्या सकाळी गंगाखेडकडे मार्गस्थ होणार आहे.
या वारीमध्ये 700 पेक्षा अधिक भाविक 2 अश्व सहभागी झाले आहेत.तर एकूण चार रिंगण या वारीचे होतात त्यातील परवा हिंगोलीत मोठ्या उत्साहात पार पडले.या वारीचे ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.