नाफेडची सोयाबीन खरेदी बंद, शेतकरी आक्रमक….

लातूर, दि. 28 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :खरेदी केंद्रावरील सोयाबीनची खरेदी दुपारपासून बंद झाली त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले, त्यांनी शेतमालाची वाहने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभी करून ठिय्या मांडला.
नाफेडच्या वतीने लातूर शहरातील गूळ मार्केट परिसरातील खरेदी केंद्रावर सुरू असलेली हमीभावाने सोयाबीनची खरेदी दुपारपासून अचानक बंद करण्यात आली. यामुळे सोयाबीन विक्रीसाठी शेतमालाच्या वाहनांसह प्रतीक्षेत असलेले नोंदणीकृत शेतकरी आक्रमक झाले, या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावरून आपली शेतमालाची वाहने काढून सरळ जिल्हाधिकारी कार्यालय गाठत त्याठिकाणी ठिय्या मांडला. या आंदोलनात शेतकरी संघटना आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी सहभागी झाले होते. जोपर्यंत सोयाबीनची खरेदी सुरू होणार नाही तोपर्यंत इथून उठणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती.
ML/ML/PGB 28 Jan 2025