मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

नागपूर, दि. 23 (एमएमसी न्यूज नेटवर्क):जिल्ह्यात आज मध्यरात्रीच्या सुमारास मुसळधार झालेल्या पावसामुळे नागपूर शहरातील तसेच ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर शहरातील अंबाझरी तलाव ओव्हर फ्लो झाल्याने शेजारी असलेल्या वस्तीमध्ये पाणी शिरले तसेच अनेकांच्या घरात देखील पाणी शिरले. शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भागात नागरिकांना वाचविण्यासाठी नावेचे सहकार्य घेण्यात आले.
झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलेले होते. बस स्थानक मोर भवन, नागपूरचे रेल्वे स्टेशन वर तसेच फलाटावर देखील पाणी साचलेले होते ज्यामुळे रेल्वे गाड्या धीम्या गतीने धावत होत्या. नाग नदी देखील दुथडी भरून वाहत होती. कळमना परिसरात पिवळ्या नदीला पूर आल्यामुळे रिकामे असलेले पिके मोठ्या प्रमाणात वाहून गेले.
हजारि पहाड येथे आज आलेल्या पावसामुळे गायी म्हशी आणि बछडे देखील दगावले. नागपूर जिल्ह्यातील मौदा तहसील मधून वाहत असणाऱ्या सांड नदीला पूर आल्यामुळे तारसा अरोली रोड हा बंद करण्यात आला, काही गावाचा संपर्क तुटला आहे पण गावातील नागरिक रोडवरून ये जा करत आहे जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे.
पोलीस प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात येत आहे. शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे. लष्कराच्या दोन तुकड्यांना ही मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे.
ML/KA/PGB 23 Sep 2023