परप्रांतियांमुळे मुंबईकरांना लागतो लेटमार्क…

 परप्रांतियांमुळे मुंबईकरांना लागतो लेटमार्क…

मुंबई, दि. २३ : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून दररोज लाखो प्रवासी लोकल ट्रेनच्या माध्यमातून प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांत परप्रांतांतून येणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांमुळे मुंबईकरांना वारंवार लेटमार्कचा सामना करावा लागत आहे. मुंबई उपनगरी रेल्वेच्या वेळापत्रकात एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने लोकल गाड्या उशिरा धावतात आणि प्रवाशांना कामावर पोहोचताना उशीर होतो.

विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी गर्दीच्या वेळी बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आदी राज्यांतून येणाऱ्या दीर्घ पल्ल्याच्या गाड्यांना मुंबईत प्रवेश दिला जातो. या गाड्यांना मुख्य मार्गावरून धावण्याची परवानगी दिल्याने लोकल गाड्यांना थांबावे लागते. परिणामी, मुंबईतील प्रवाशांना दररोज १५ ते ३० मिनिटांचा उशीर होतो.

रेल्वे प्रशासनाने एक्सप्रेस गाड्यांना वेळेवर पोहोचवण्यासाठी लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. मात्र याचा फटका थेट मुंबईकरांना बसतो. कामावर पोहोचताना उशीर झाल्यामुळे अनेकांना ऑफिसमध्ये लेटमार्क मिळतो. काही कंपन्यांनी तर कर्मचाऱ्यांना वेळेवर पोहोचण्यासाठी कठोर नियम लागू केले आहेत.

मुंबईतील प्रवासी संघटनांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे की, मुंबईतील लोकल प्रवाशांची संख्या दररोज ७० लाखांहून अधिक आहे. अशा वेळी परप्रांतीय एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देणे अन्यायकारक आहे. लोकल गाड्यांना वेळेवर धावण्यासाठी स्वतंत्र मार्गिका तयार करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

रेल्वे प्रशासनाने मात्र यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, एक्सप्रेस गाड्यांना वेळेवर पोहोचवणे आवश्यक आहे कारण त्या देशभरातील प्रवाशांना जोडतात. तरीही मुंबईकरांच्या तक्रारी लक्षात घेऊन लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *