*गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत

 *गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत

मुंबई, दि १५
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे मिळाली पाहिजेत,यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष आमदार सचिनभाऊ अहिर यांच्या नेतृत्वाखाली लढा उभा करण्याचा एकमुखी ठरावा द्वारे निर्णय आज राष्ट्रीय राष्ट्रीय मजूर संघाच्या कार्यालयात पार पडलेल्या सर्व संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर आता सर्वच कामगार संघटनांनी एकत्र यावे, यासाठी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी गिरणी कामगार घराच्या प्रश्नावर महाराष्ट्रात विविध ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कामगार संघटनांना या बैठकीसाठी निमंत्रित केले होते. त्याप्रमाणे अपेक्षेपेक्षा अधिक प्रतिनिधींनी‌ आजच्या बैठकीला उपस्थित राहून घरांचाप्रश्न किती उग्र आणि संतापजनक आहे, हे दाखवून दिले.
‌‌ आजच्या बैठकीत सेलू आणि वांगणी येथील गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध करण्यात आला आहे.मुंबई ऐवजी सेलू आणि वांगणी येथे गृहनिर्माण प्रकल्प उभा करण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कामगार संघटनेचा‌ आजच्या बैठकीत तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
राज्य सरकारने दिनांक १५ मार्च २०२४ रोजी पारित केलेल्या अध्यादेशात कॉलम क्रमांक १७ मध्ये चक्क म्हटले आहे, गिरणी कामगारांना घरे देण्याबाबत हा अंतिम निर्णय असेल, कामगार सदर घर घेण्यास इच्छुक नसेल तर त्याच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, हे कामगारांना जाचक ठरणारे,अन्यायी कलम १७ रद्द करण्यात यावे, अशी आजच्या सभेत एक मुखी मागणी करण्यात आली.
अलिकडे सेलू येथील घरे घेण्यासाठी कामगार व वारसांवर दबाव आणला जात आहे.सरकारी दप्तरातून पात्र कामगारांची नावे मिळवून, कामगारांना वारंवार सतावण्याचे काम
तथाकथित कामगार पुढारी प्रवीण घाग करीत आहेत,त्यांचा आजच्या बैठकीत कामगार नेत्यांनी
आपल्या भाषणात निषेध केला आहे.
खाजगी विकासाकडून म्हाडाच्या बोधचिन्हाचा अनधिकृतरित्या वापर करण्यात येत आहे,या कृतीचा आजच्या बैठकीत निषेध करण्यात आला असून,हा प्रश्न सरकार दरबारी नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.या प्रश्नावर लवकरच महामोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या बैठकीला हेमंत धागा जन कल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी,गिरणी कामगार सेनेचे अध्यक्ष सत्यवान उभे,सरचिटणीस बाळ खवणेकर,संयुक्त मराठीचे रमाकांत बने, सर्व श्रमिक संघटनेचे कल्पेश नाडकर्णी,राजाराम मोरे,एनटीसी कामगार असोसिएशनचे बबन मोरे, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचे आनंद मोरे, सचिन मनोहर चव्हाण,इंद्रायणी महादेव सावंत,शंकर मगदूम, ऍड.बबन मोरे,संयुक्त मराठी चळवळीचे रवींद्र सोनू गवळी, इब्राहिम खान इत्यादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत अनेकांनी आपले ठाम विचार मांडून, येत्या पावसाळी अधिवेशनात सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली एक मोठे महाआंदोलन‌ छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबईत घर मिळेपर्यंत हा लढा चालू ठेवण्याचा आजच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे
राष्ट्रीय मिल‌ मजदूर संघाचे निवृत्ती देसाई,अण्णा शिर्सेकर, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर, शिवाजी काळे इत्यादी पदाधिका-यांनी या प्रसंगी मार्गदर्शन केले. ‌KK/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *