मुंबईत दर शनिवारी मिळणार तिरुपती बालाजीचे पवित्र लाडू प्रसाद

मुंबई, दि. 22 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :मुंबईतील तिरुपती बालाजी भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दर शनिवारी सायन येथील तिरुपती बालाजी मंदिरात आंध्रप्रदेशातील प्रसिद्ध “श्रीवरी लाडू प्रसादम” उपलब्ध होणार आहे. इंडिया पोस्टच्या पॅन इंडिया नेटवर्कमुळे हे शक्य झाले आहे.
मुंबई सायन सर्कल येथील ६७ जयंत हाऊस, युनायटेड जैन स्टुडंट होम रोड या ठिकाणी हे लाडू उपलब्ध असणार आहेत.तिरुपती बालाजीचे भक्त दर शनिवारी या पवित्र प्रसादाचा लाभ घेऊ शकतात.
तिरुपती लाडू अर्पण करण्याची परंपरा १७१५ अर्थात ३०० वर्षांहून अधिक जुनी आहे. मंदिर व्यवस्थापन लाडू प्रसादाच्या पवित्रतेची आणि शुद्धतेची खात्री देते. या लाडूंमध्ये बेसन पीठ, साखर, काजू, मनुका, वेलची आणि शुद्ध तूप यांचा वापर केला जातो.
लाडू प्रसाद १५ दिवसांपर्यंत ताजे राहावे यासाठी आधुनिक पॅकिंग तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामुळे भाविकांना त्यांच्या श्रद्धेचा पवित्र प्रसाद ताज्या स्वरूपात प्राप्त होतो.असा दावा मंदिराने केला आहे.
ML/ML/PGB 17 March 2025