संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचे मराठवाडा हद्दीत आगमन….

 संतश्रेष्ठ मुक्ताबाई यांच्या पालखीचे मराठवाडा हद्दीत आगमन….

जालना दि १५:– मानाच्या सात पालख्यांपैकी एक असलेली आदीशक्ती संतश्रेष्ठ मुक्ताबाईंच्या पालखीचे आज विदर्भातून मराठवाड्यात आगमन झाले. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात मुक्ताबाईंची पालखी दाखल झाली आहे. उद्या या पालखीचे जालना शहरात आगमन होणार आहे. दीड हजार महिला व पुरुष वारकरी असलेली ही पालखी सर्व पालख्यांमधील सर्वात जास्त पायी प्रवास करणारी पालखी आहे.

मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे यंदाचे 317 वे वर्ष असून खान्देश, विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र अशा विविध भागातून प्रवास करित ही मनाची पालखी पंढरीच्या वाटेकडे प्रवास करते. ऊन, वारा, पाऊस – पाणी कसली ही तमा न बाळगता सर्व वारकरी ज्ञानोबा – तुकोबाचा गजर करीत पंढरीला जाऊन विठुरायाला भेटण्यासाठी आतुर झाले आहेत. दरम्यान, 6 जून रोजी मुक्ताईनगर येथून या पालखीचे प्रस्थान झाले असून आषाढी एकादशीच्या 2 दिवस आगोदर ही पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे अशी माहिती मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे प्रमुख रवींद्र महाराज हरणे यांनी दिली आहे. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *