Indigo ची २५० हून अधिक उड्डाणे रद्द

 Indigo ची २५० हून अधिक उड्डाणे रद्द

मुंबई, दि. ४ : देशातील सर्वात मोठी विमान कंपनी Indigoला सलग तिसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. याचा Indigoच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला आहे. वृत्तसंस्था PTI नुसार, आज दिल्ली आणि मुंबईसह १० हून अधिक विमानतळांवर इंडिगोची ३०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली.

पुणे विमानतळावरील एका प्रवाशाने आठ तासांहून अधिक वेळ वाट पाहिल्याची तक्रार केली. विमानतळाचे दोन्ही मजले प्रवाशांनी खचाखच भरलेले आहेत. तीन प्रवासी तर बेशुद्धही झाले. विमान रद्द करण्याबाबत विमान कंपनीकडून कोणताही संदेश मिळालेला नाही.

आज दिल्ली विमानतळावर इंडिगोची एकूण ९५ उड्डाणे रद्द करण्यात आली. यामध्ये ४८ निघणाऱ्या आणि ४७ येणाऱ्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा समावेश आहे. मुंबईत ८६, बेंगळुरूमध्ये ५०, हैदराबादमध्ये ७०, जयपूरमध्ये ४ आणि इंदूरमध्ये ३ उड्डाणे रद्द करण्यात आली.

नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) १ नोव्हेंबरपासून सर्व विमान कंपन्यांसाठी सुरक्षा नियमांमध्ये सुधारणा केल्या आहेत, जे वैमानिक आणि इतर क्रू सदस्यांच्या कामाचे नियमन करतात. या बदलाचा विशेषतः इंडिगो एअरलाइन्सवर परिणाम झाला आहे. आज, Indigoच्या अधिकाऱ्यांनी DGCA या विषयावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली.

DGCA नुसार, कर्मचाऱ्यांची (क्रू) कमतरता हे याचे मुख्य कारण आहे. इंडिगोमध्ये ही समस्या गेल्या महिन्यापासून सुरू आहे. नोव्हेंबरमध्ये त्याची १२३२ विमाने रद्द झाली. मंगळवारी १४०० विमाने उशिराने धावली.

SL/ML/SL

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *