संसदेत मोदींनी घेतला राहूल गांधी यांचा समाचार

 संसदेत मोदींनी घेतला राहूल गांधी यांचा समाचार

नवी दिल्ली, दि. 8 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :  आज संसदेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांच्या अभिभाषणाच्या प्रस्तावावर संबोधन करताना आज पंतप्रधान मोदी यांनी कॉंग्रेस खासदार राहूल गांधी यांचा चागला समाचार घेतला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात अदाणी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संबंध असल्याचे सांगून टीका केली होती. त्या टीकेला पंतप्रधान मोदी यांनी आज उत्तर दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “अनेक लोकांनी आपापले आकडे दिले. काहींनी स्वतःचा तर्क मांडला. या भाषणांवरुन कुणाची किती क्षमता आहे, कुणाची किती योग्यता आणि समज आहे, हे लक्षात येते. काल काही लोकांच्या भाषणानंतर पूर्ण इकोसिस्टिम, समर्थक उड्या मारत होते. अनेकजण भाषणाचे कौतुक करत होते. कदाचित त्यांना काल रात्री चांगली झोप लागली असेल. आज कदाचित ते उठले देखील नसतील. अशा लोकांसाठी बोलले जाते, ‘ये केह केहकर हम, दिल को बेहला रहे है, वो अब चल चुके है, वो अब आ रहे है” अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता टीका केली.”

पंतप्रधानांच्या भाषणातील मुख्य मुद्दे

  • पंतप्रधान मोदी म्हणाले की, 2004 ते 2014 या काळात भारताची अर्थव्यवस्था ढासळली. महागाई दोन अंकी राहिली. म्हणूनच काही चांगले झाले तर त्यांना निराशा जास्त येते.  ”2004 ते 2014 हे स्वातंत्र्याच्या इतिहासातील घोटाळ्यांचे दशक आहे. यूपीएच्या याच 10 वर्षात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भारताच्या कानाकोपऱ्यात दहशतवादी हल्ले होत राहिले. त्यांच्या काळात देश सुरक्षित नव्हता.”
  • पंतप्रधान म्हणाले की, त्या 10 वर्षांत भारताचा आवाज जागतिक व्यासपीठावर इतका कमकुवत होता की कोणीही ऐकायला तयार नव्हते. प्रत्येक संधीचे संकटात रूपांतर करणे ही यूपीएची ओळख बनली आहे. जेव्हा तंत्रज्ञानाचे युग खूप वेगाने वाढत होते, त्याच वेळी ते 2G मध्ये अडकून राहिले.  2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. सीडब्लूजी घोटाळ्याने संपूर्ण देश जगात बदनाम झाला.
  • पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशावर इतके दहशतवादी हल्ले झाले. 2008 मध्ये झालेला दहशतवादी हल्ला कोणीही विसरू शकत नाही. 10 वर्षे देशभर रक्त वाहत होते. 2004 ते 2014 हे दशक The lost decade दशक म्हणून ओळखले जाईल. 2030 हे दशक संपूर्ण जगात भारताचे दशक आहे.

  • पंतप्रधान  मोदी म्हणाले की, काही लोकांना येथे हार्वर्ड अभ्यासाची मोठी क्रेझ आहे. कोरोनामध्येही असेच म्हटले होते… हार्वर्डमध्ये भारताच्या वाईट परिस्थितीवर चर्चा होईल, असे काँग्रेसने म्हटले होते. काल पुन्हा हार्वर्ड अभ्यासाचं नाव घेतलं. गेल्या काही वर्षांत हार्वर्डमध्ये खूप चांगला अभ्यास केला गेला आहे, तो विषय आहे The Rise & Decline of India’s Congress Party. मला खात्री आहे की भविष्यात काँग्रेसच्या वाईट परिस्थितीवर जगात अभ्यास होईल.
  • पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”काही लोक आपल्या कुटुंबासाठी खूप काही उद्ध्वस्त करण्यास तयार आहेत. काही लोक स्वतःसाठी, कुटुंबासाठी जगत असतात. मोदी 140 कोटी कुटुंबीयांचा सदस्य आहे, 140 कोटींचे आशीर्वाद मोदींसोबत आहेत.”

SL/KA/SL

8 Feb 2023

mmc

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *