वाढत्या उन्हाची झळ ,पाणी आटल्याने स्थलांतरित पक्ष्यांवर संकट

सिंधुदुर्ग, दि.१ ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दिवसेंदिवस वाढत्या उन्हाची झळ माणसांप्रमाणे पशु पक्ष्यांना देखील बसू लागली आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील पाट तलावाला आणि तलावात विहंगम करणाऱ्या पक्षांना ही झळ बसत आहे . कितीही कडक उन्हाळा असला तरी पाट तलावतील पाणी पूर्णतः कधीही आटत नाही. परंतु यावर्षी मात्र भयंकर कडक उन्हामुळे पाणीसाठा कमालीचा आटला आहे.
या तलावाचे आणि याठिकाणी येणारे स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी याचे पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण आहे . कडाक्याच्या उन्हामुळे पाणी कमी झाल्यामुळे पुढील काळात पक्ष्यांना पाण्याच्या शोधात फिरावे लागणार आहे. यंदा उष्णतेचा पारा चढल्याने पाट तलावाच्या पाणीसाठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे केवळ चातकच नव्हे सर्वच पशु पक्षी पावसाची आतुरतेने वाट पहात आहेत.
30 May 2023