ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो लाईन-9 च्या ट्रायल रनला सुरुवात

 ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो लाईन-9 च्या ट्रायल रनला सुरुवात

मुंबई दि १४ — मुंबई महानगर प्रदेशासाठी (MMR) मेट्रो लाईन-9 च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला औपचारिकपणे सुरुवात झाली. या निमित्ताने ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा कार्यान्वित होण्याच्या दिशेने आज महत्वाचं पाऊल उचललं गेलं. मेट्रोच्या या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते सुरुवात पार पडली.

यावेळी मेट्रोची तांत्रिक पाहणीही करण्यात आली.
सदर कार्यक्रमास मंत्री प्रताप सरनाईक, डॉ. संजय मुखर्जी , महानगर आयुक्त, एम एम आर डी ए ,निरंजन डावखरे, सदस्य विधान परिषद, नरेंद्र मेहता, आमदार, या प्रसंगी विक्रम कुमार, अतिरिक्त महानगर आयुक्त–१, एम एम आर डी ए , रूबल अग्रवाल, व्यवस्थापकीय संचालक, एमएमएमओसीएल; आणि राधाबिनोद शर्मा, आयुक्त तथा प्रशासक, मिरा-भाईंदर महानगरपालिका हेही उपस्थित होते.

मेट्रो लाईन-9: ठाणे जिल्ह्याचा बदल घडवणारा प्रकल्प
मुंबईत पहिल्यांदाच अशा प्रकारचा डबल डेकर प्रकल्प उभारण्यात आला आहे, जिथे मेट्रो आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत आहेत. मेट्रो लाईन-9 चा पहिला टप्पा हा दहिसर (पूर्व) ते काशिगावपर्यंत ४.४ किमी लांबीच असून या मार्गावर चार स्थानके आहेत – दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव.

जोडणीचे नवे दालन

या मेट्रोमुळे मिरा-भाईंदरकरांसाठी मुंबईच्या विविध कोपऱ्यांपर्यंत पोहोचणं अधिक सोयीचं आणि वेगवान होणार आहे:
• CSMIA आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडणी (लाइन 7, 7A द्वारे)
• अंधेरी पश्चिम (लाइन 2B)
• घाटकोपर (लाइन 1 व 7)
• लिंक रोड (दहिसर पूर्व – लाइन 2A)
• मिरा गाव मेट्रोस्टेशन मार्गे मेट्रो लाईन 10 व्दारे ठोण्याला जोडणे (भविष्यात )
• भविष्यात वसई-विरार (लाइन 13 – NSCB स्थानक)

अपेक्षित फायदे:

• दहिसर टोल नाका परिसरातील वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी होईल
• प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषणात लक्षणीय घट
• ऊर्जा बचतीसाठी ‘रिजेनेरेटिव्ह ब्रेकिंग’ तंत्रज्ञान
• पर्यावरणपूरक बांधकाम पद्धतींचा वापर
• सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायक आणि वेळेत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की
*”या प्रकल्पाच्या तांत्रिक चाचण्या सुरू झाल्या आहेत. ही मेट्रो लाईन वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावेल. पहिल्यांदाच मेट्रो आणि उड्डाणपूल एकत्रित स्वरूपात तयार करण्यात आले आहेत.
मिरा-भाईंदरसाठी ही लाईन मोठा बदल घडवणारी ठरणार आहे. यावर्षी ५० किमी, पुढील वर्षी ६२ किमी आणि तिसऱ्या वर्षी ६० किमी मेट्रो सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे. २०२७ पर्यंत मेट्रो प्रवासाचा झपाट्याने विस्तार होईल.”

ML.MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *