संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं मेंढ्यांच रिंगण पडलं पार……

 संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यातील पहिलं मेंढ्यांच रिंगण पडलं पार……

पुणे दि २७– श्रीसंत तुकोबाराय यांच्या पालखीला मेंढ्यांचं अनोखं रिंगण घातलं जातं. दरवर्षी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं काटेवाडीत आगमन
झाल्यावर पालखीला मेंढ्यांचं रिंगण घातलं जातं.
आज देखील काटेवाडी येथे हा रिंगण सोहळा पार पडला.
यामध्ये माने केसकर महानवर, काळे, मासाळ यांच्या मेंढ्यांना हा मान असतो.

काही वर्षापूर्वी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं बारामतीत आगमन झालं होतं. त्यावेळेस
काटेवाडी आणि आसपासच्या परिसरात मेंढ्यांवर एका विशिष्ट रोगाची साथ पसरली होती. त्या साथीत अनेकांच्या मेंढ्या मरण पावू लागल्या होत्या.

त्यावेळेस काटेवाडीत संत तुकाराम महाराजांची पालखी आली असता एक मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांसह तुकोबारायांना तीन रिंगणे
घातली होती. मेंढ्यांवरचा रोग संपू दे आणि त्या जिवंत राहू दे अशी प्रार्थना त्यावेळेस त्या मेंढपाळाने केली होती. पुढे हीच परंपरा कायम राखली गेली आणि आजही
काटेवाडीत संत तुकोबांच्या पालखीचं आगमन होताच मेंढ्यांचं अनोखं रिंगण पाहायला मिळतं. ML/ML/MS

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *