भारताकडून पॅलेस्टिनींसाठी वैद्यकीय मदतीचा हात

नवी दिल्ली, दि. २२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाला १५ दिवस उलटून गेले आहेत. पण हा संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीत. या भीषण संघर्षामध्ये इस्रायल आणि हमास मधील हजारो नागरिकांचा बळी गेला आहे.इस्रायलच्या हल्ल्यामुळे गाझापट्टीत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गाझातील नागरिकांचे अन्न-पाण्यावाचून हाल होत आहे, तर औषधांचा साठाही अपुरा आहे. भारताने रविवारी पॅलेस्टाईनला मदतीचा हात दिला. भारताने संघर्षात अडकलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांसाठी 6.5 टन मेडिकल मदत आणि जीवनाश्यक वस्तू पाठवल्या आहेत. भारताने पॅलेस्टिनी नागरिकांच्या लोकांना मानवतावादी मदत पाठवल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी एक्स मीडियावर ट्वीट करत दिली आहे.
या ट्विटमध्ये त्यांनी लिहीलं आहे की, पॅलेस्टाईनमधील नागरिकासाठी सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन IAF C-17 उड्डाण इजिप्तमधील अल-अरिश विमानतळाकडे रवाना झालं. यामध्ये औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, तंबू, स्लिपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छताविषयक वस्तू, पाणी शुद्धीकरण गोळ्या यासह इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.
अन्न, पाणी आणि औषधे यांसारख्या मदत सामग्रीने भरलेला ट्रक शनिवारी इजिप्तमधून रफाह क्रॉसिंगवरून गाझामध्ये दाखल झाले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुमारे 20 ट्रक इजिप्तची सीमा ओलांडून गेले होते. मात्र, रफाह क्रॉसिंगवर सुमारे 170 ट्रक उभे होते आणि त्यापैकी 100 ट्रक पॅलेस्टाईनमध्ये जाणार होते, पण सध्या इस्रायलने फक्त 20 ट्रकला प्रवेश दिला.
SL/KA/SL
22 Oct. 2023