पवित्र मंदिर असलेले मातोश्री आता उदास, तिथून रडण्याचा आवाज येतो

कोल्हापूर, दि. 17 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असताना मातोश्री हे पवित्र मंदिर होतं आता मातोश्री उदास झाली आहे. जिथं वाघाची डरकाळी येत होती तिथं आता रडण्याचा आवाज येतोय अशी बोचरी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज केली. गेले दोन दिवस सुरू असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा समारोप प्रसंगी ते बोलत होते.
शिवसेना अशीच मोठी झाली नाही.
रक्ताचं पाणी केलं लोकांनी, घरावर
तुळशीपत्र ठेवले. आयत्या पिठावर
रांगोळीही नीट मारता आली नाही. मनोहर
जोशींना भर व्यासपीठावरून उतरवण्याचं
काम तुम्ही केलं, असला कोणता पक्ष प्रमुख असतो जो नेत्यांचा पाणउतारा करतो, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
कदमांचा मनोहरपंत करायचा होता. नारायण राणे, राज ठाकरे यांनी असं काय मागितलेलं की त्यांचा तुम्हाला त्रास होत होता, असा सवालही एकनाथ शिंदे यांनी उपस्थित केला.
बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन जात आहोत. म्हणून ही आजची शिवसेना आहे. या महाअधिवेशनामुळे आता शिवसेना कुणाची आहे हे सांगण्याची आवश्यकता राहिली नाही, असं शिंदे यांनी म्हणाले. चार सत्रात झालेल्या या महाधिवेशनाच्या शेवटच्या सत्रात उद्योग मंत्री उदय सामंत, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आदींनी आपल्या भाषणातून उबाठा शिवसेनेवर कडाडून हल्ला केला.
माझा आवाज असा बंद करु नका.तसा तो बंद होणार नाही.कारण माझ्या सोबत शिवसैनिक आहेत, असं एकनाथ शिंदे आपल्या भाषणात म्हणाले. किती तरी आमदार शिवसेनेत आलेत येताहेत. हजारो लोक येताहेत.कोणी इकडे आले की गद्दार आणि कचरा! हेच शिवसैनिक कच-यांत तुम्हाला जमा करतील, असा इशारा शिंदे यांनी यावेळी बोलताना दिला.
शिंदे पुढे म्हणाले, मी मुख्यमंत्री झालो शिवसेना आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादानं.
आज आत्मपरीक्षण, आत्मचिंतन कुणी केलं पाहिजे? मी जिथं जिथं जातो तिथे लोक का उशीरा उशीरा पर्यंत थांबतात?
हे प्रेम, ही आपुलकी पैसे देऊन मिळवता येत नाही. हे कामातून वागण्यातून मिळत असते आणि म्हणुन आज पक्ष वाढतोय पुढे जातोय. शिवसेनेचं हिंदुत्व व्यापक आहे.आता हिंदूहृदय सम्राट बोलायला तुमची जीभ का कचरते? असा सवाल त्यांनी केला. काँग्रेसला लांब ठेवायला बाळासाहेब बोलले होते.पण यांनी तर मांडीवर घेऊन बसवले.शिवसेना वाचविण्याकरिता हे धाडस आम्ही केलं.
शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं. त्यामुळे आम्ही हे पाऊल उचललं.
सत्तेवर आलो आणि शेतक-यांसाठीच पहिला निर्णय घेतला. वारकरी लोक, इतर पक्षातील लोकं शिवसेनेत येताहेत.
तुमची संपत्ती मला नको. बाळासाहेबांचे विचार हीच आमची संपत्ती आहे.
बाळासाहेब कोणा एकट्याचे नव्हते.
ते बाळासाहेब शिवसैनिकांचे दैवत होते, असं त्यांनी सांगितलं. यांना पक्ष प्रमुख पदाचा मोह २००४ पासून होता. याचे अनेक साक्षीदार आहेत. शरद पवार म्हणाले, तुम्ही मुख्यमंत्री व्हा,हे मला ते सांगत होते. तेव्हा रडवेला चेहरा होता. तेव्हा जाणवलं यांना मोह झालाय.
मी कधीच पदाला हपापलो नव्हतो.
त्यांनी मला आधीच सांगितलं असतं तर मी तसा माहौल तयार केला असता, असं शिंदे यांनी सांगितलं.
ते दिसतात तसे इनोसंट नाहियेत, त्यामागे अनेक चेहरे आहेत. एक चेहरे पे कई चेहरे लोग लगाते है लोग.लग्न एका सोबत, हनीमून एका सोबत असं त्यांनी केलं आहे. हे मी संसदीय शब्द बोलतोय मी कधीही असंसंदीय शब्द बोलत नाही निलम ताई सांगतील, असं ते म्हणाले.
मविआसोबत दिल्लीला गेले होते पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना भेटायला. तेव्हा एकटेच गेले केबिन मध्ये मोदींना भेटायला आणि बाहेर आल्यावर घाम फुटला होता. दोन ग्लास पाणी प्यायले होते हे मला अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी सांगितल्याचं ते म्हणाले.
शिवसैनिकांचे शक्तीपीठ या
अधिवेशनाच्या निमित्तानं अवतरलंय.
अंबाबाईचं दर्शन घेऊनच बाळासाहेब सभेला सुरुवात करायचे; आपणही तेच केल्याचं शिंदे यांनी सांगत अधिवेशनाचा समारोप केला. Matoshree, who is a holy temple, is now depressed, the sound of crying is heard from there
ML/KA/PGB
17 Feb 2024