अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे निधन

सोलापूर, दि. १८ : अरण्यऋषी अशी ओळख असलेले ज्येष्ठ लेखक आणि माजी वनाधिकारी पद्मश्री मारुती चितमपल्ली (९३) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. सोलापूरमधील त्यांच्या राहत्या घरी आज सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने भारतीय पर्यावरण आणि साहित्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांना 30 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. पक्षिकोश, पाखरमाया, रानवाटा यांसारख्या ग्रंथांमधून निसर्गाचे अद्भुत विश्व मराठी भाषेत शब्दबद्ध करुन त्यांनी भाषा समृद्ध केली.
चितमपल्ली यांची साहित्यसंपदा
चितमपल्ली यांनी अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतीची वैशिष्ट्यांसह वन्य जीवन विषद करणारी 25 पुस्तके लिहिली.
पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन , रातवा, मृगपक्षिशास्त्र, घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप, आनंददायी बगळे, निळावंती , पक्षिकोश चैत्रपालवी, केशराचा पाऊस, चकवाचांदण : एक वनोपनिषद, चित्रग्रीव, जंगलाची दुनिया, An Introduction to Mrigpakshishastra of Hansdev, नवेगावबांधचे दिवस ही चितमपल्ली यांची महत्त्वाची पुस्तके आहेत.
Maruti Chitampally passes away