मनोज जरांगे करणार पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा…

 मनोज जरांगे करणार पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा दौरा…

जालना, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मनोज जरांगे यांच्या शांतता रॅलीच्या दुसऱ्या टप्प्याला 7 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 7 ते 13 ऑगस्ट मनोज जरांगे पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राचा दुसऱ्या टप्प्यातील दौरा करणार आहेत. 7 ऑगस्ट रोजी सोलापूर जिल्ह्यातून दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याला सुरुवात होईल तर 13 ऑगस्ट रोजी नाशिक मध्य दुसऱ्या टप्प्यातील दौऱ्याचा समारोप होणार असल्याची माहिती मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी दिली.

जालन्यातल्या अंतरवाली सराटीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 7 ऑगस्ट रोजी सोलापूर, 8 ऑगस्ट रोजी सांगली, 9 ऑगस्ट रोजी कोल्हापूर, 10 ऑगस्ट रोजी सातारा, 11 ऑगस्ट रोजी पुणे, 12 ऑगस्ट रोजी अहमदनगर आणि 13 ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात मनोज जरांगेंच्या उपस्थितीत मराठा आरक्षण जनजागृती आणि शांतता रॅली काढण्यात येणार आहे. दरम्यान या रॅलीत सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होत जातीसाठी एक दिवस सर्वांनी आपले कामं धंदे बाजूला ठेवून एकत्र यावं असं आवाहन मनोज जरांगेंनी केले आहे.

ML/ML/SL

18 July 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *