28 हजार विद्यार्थ्यांनी केले ‘मनाच्या श्लोकां ‘ चे पठण….

 28 हजार विद्यार्थ्यांनी केले ‘मनाच्या श्लोकां ‘ चे पठण….

नागपूर, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या खासदार सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत नागपुरातील ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावर समर्थ रामदास स्‍वामी यांनी रचलेल्या ‘मनाचे श्‍लोक’ च्या पाठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. या उपक्रमात नागपुरातील 175 शाळांमधील 28 हजार 329 विद्यार्थी आणि 1215 शिक्षक सहभागी होत त्यांनी 51 मनाचे श्लोक सामूहिकरीत्या पठण केले.

‘वंदेमातरम् ‘ या गीताला 150 वर्षे पूर्ण झाल्‍या‍ निमित्‍ताने यावेळी विद्यार्थी आणि शिक्षकांनी वंदेमातरम् गीताचे सामूहिक गायन देखील केले. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्‍यासह ‘वर्ल्‍ड रेकॉर्ड बुक्‍स ऑफ इंडिया’ चे प्रतिनिधी प्रामुख्‍याने उपस्थित होते. मनाचे श्लोक हे सतराव्या शतकात संत श्री रामदास स्वामी यांनी रचलेला हा एक ग्रंथ आहे. मनाचे श्लोक हे मानसशास्त्र आणि व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित आहेत ज्यामुळे व्यक्तिमत्व विकसित आणि बळकट करण्यास सक्षम करते यामुळे जीवनाशी जुळवून घेता येते तसेच व्यक्तिमत्व विकासामुळे बालपणापासूनच आत्म जागरुकता आणि त्यांच्या मानसिकतेची समज वाढू लागते.

आजच्या या झपाट्याने वाढणाऱ्या स्पर्धात्मक युगात बालपणापासूनच निरोगी आशावादी व्यक्तिमत्व असणे गरजेचे असते. मनाच्या श्लोकातून हे उत्तम रित्या मांडले जाते यातूनच आत्मविश्वास वैयक्तिक तसेच सामाजिक संबंध साध्य करता येते. यावेळेला एक नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला. वर्ल्ड रेकॉर्डस् बुक ऑफ इंडिया कडून त्यांचे प्रतिनिधी रेणू अग्रवाल आणि नचिकेत जामदार यांनी या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून काम पाहिले. या विक्रमाची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाने घेऊन चीफ एडिटर सुषमा नार्वेकर यांच्या हस्ते मेडल आणि सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया आजतागायत अशा अनेक विविध क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला, संघटनेला व्यासपीठ देण्याचे आणि प्रोत्साहित करण्याचे काम अविरत करत आहे.

ML/ML/PGB 20 Dec 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *