२४ तारखेपर्यंत आरक्षण द्या अन्यथा पुढील दिशा ठरवू

जालना, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): सरकारने मागितलेली ३० दिवसांची मुदत आज संपली,पण अजून सरकार कडे १० दिवस आहे , सरकारने २२ तारखे पर्यंत निर्णय घेतला नाही तर २२ तारखेला पत्रकार परिषद घेऊन पुढची दिशा ठरवू असे मनोज जरांगे यांनी लाखोने उपस्थित जनसमुदाय समोर स्पष्ट केले.आपण पुन्हा तीव्र उपोषणाला बसू,मग एक तर आदेशाचा जल्लोष होईल नाहीतर माझी अंतयात्रा निघेल असा इशारा जरांगे यांनी दिला.
लाखोंच्या समुदायाला संबोधित करताना मनोज जरांगे यांनी चौफेर टोले बाजी केली. आज 12 वाजेला सुरू होणारी सभा थोडी अगोदर सुरू करण्यात आली. उन्हाचा वाढता पारा लोकांसाठी त्रासदायक ठरू नये म्हणून मनोज यांनी थोडे लवकर बोलायला सुरुवात केली. नजरेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मराठा समाज बांधव दिसत होते.
सुरुवातीला मनोज यांनी उपस्थित समाज बांधवांसह उपस्थित पोलिस अधिकारी कर्मचाऱ्यांचे,पत्रकारांचे आभार मानले.आजची सभा ही मराठ्यांसाठी महत्त्वाची असून सरकारनी 22 तारखे पर्यंत सकारात्मक निर्णय द्यायलाच पाहिजे.आणि त्यासाठी 22 तारखेला पत्रकार परिषद घेऊन आपण पुढची दिशा ठरवू असे सांगत त्यांनी आलेल्या समाज बांधव,भगिनींनी शांततेने घरी जाण्याचे आवाहन केले. मराठा समाज हा शांतताप्रिय असला,शेतीत घाम गळणारा असल्याने त्यांना सरकारने सोप्यात घेऊ नये.
24 तारखे पर्यंत आरक्षण मिळाले नाही तर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही, मी पुन्हा तीव्र उपोषणाला बसेल मग एक तर आदेशाचा जल्लोष होईल नाहीतर माझी अंत्ययात्रा निघेल असा सज्जड इशारा जरांगे यांनी दिला. Make reservation by 24th otherwise we will decide further direction
ML/KA/PGB
14 Oct 2023