अध्यात्मिक सुखाला पर्यावरण संवर्धनाची जोड
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क): करवीर निवासिनी अंबाबाईला अभिषेक केल्याने भाविकांना देवीच्या सेवेचे समाधान लाभते. कुलदेवीचे स्मरणही अभिषेकातून होऊन जाते. मनोकामना पूर्णत्वाला गेल्या प्रित्यर्थ अंबाबाईला केला जाणारा अभिषेकही भाविकांना सुखावणारा असतो.
आता याच अध्यात्मिक सुखाला पर्यावरण संवर्धनाची जोड Linking environmental conservation to spiritual happiness मिळाली आहे. अंबाबाईला अभिषेक करणाऱ्या भाविकांना पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती व सह्याद्री देवराई यांच्याकडून देशी झाडांचे रोप दिले जात आहे.गेल्या दिवाळीपासून सुरु केलेल्या या उपक्रमातून तीन हजारहून अधिक रोपांचे वाटप भाविकांना केले आहे.या रोपांची लागवड शेतामध्ये अथवा घराजवळ करुन त्यातून भाविक उत्पन्न मिळवू शकणार आहेत.
ML/KA/PGB
30 Nov .2022