ऐकूयात मातीची हाक!

मुंबई, दि. 5 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “तो ओला कचरा कोरड्या कचऱ्याबरोबर एकत्र नको करूस. ओल्या कचऱ्याचे खत करतो आपण. भरपूर
खत तयार झालं, की, आपल्या झाडांना घालायचं आणि राहिलेलं जवळच्या शेतकऱ्यांना द्यायचं.” Don’t
mix that wet waste with dry waste. We make organic fertilizer from it. Then we use
for our plants and remaining fertilizer, we’ll give to the nearby farmers.
“पण एवढा उपद् व्याप करायचं कारण काय?” But why bother?
“ऐकायचंय?, संयुक्त राष्ट्रसंघाने असा अंदाज बांधलाय की, आत्ताच्या गतीने मातीची गुणवत्ता घसरत
राहिली तर ६० वर्षांपेक्षाही कमी वर्षे आपल्याला माती उपलब्ध राहील. मग पुढच्या दोन पिढ्यांसाठी तरी
आपण अन्नधान्य – भाजीपाला – फळे पिकवू शकणार आहोत का? पृथ्वी वाचवायची असेल आणि
आपल्याला प्रिय असणारी आपली मुलं-बाळं निरोगी आणि सशक्त राहावी असं वाटत असेल तर अजूनही
वेळ गेलेली नाही. पण त्यासाठी आपण प्रत्येकाने आत्ता, या क्षणापासून आपल्या घरातल्या ओल्या कचऱ्याचे
सेंद्रिय खत करण्याचा निश्चय करायला हवा.”
The United Nations estimates that at current rates of depletion, we have fewer than
60 years of soil left on Earth.
Will humans be able to grow food two generations from now? The answer depends
on what we do now!
It is not too late to change the future and save the planet and people we love – if we
act NOW.
“त्याने काय होणार?” What will happen?
“ खूप काही साध्य होईल. तुम्हाला माहीत आहे मातीचा कस का गेला ते? ऐकाच, भरपूर कृषिउत्पादन
मिळावे म्हणून पद्धतशीरपणे रासायनिक खत तयार करणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांना भुरळ घातली. त्याचा
वापर सुरु झाला. (Use of Chemical Fertilizers) त्याहीपेक्षा अधिक उत्पादन मिळावे म्हणून गुणसूत्र-
आधारित कृत्रिम बियाणे (Use of Genetically Modified Organisms- जी.एम.ओ.) वापरल्याने
किती आर्थिक फायदा आहे, हेही गळी उतरवले गेले. त्याच वेळी औद्योगिक शेती(Industrial
Agriculture) आर्थिकदृष्ट्या किती फायद्याची आहे हेही सतत सांगण्यात आले. याचा परिणाम काय झाला
माहीत आहे?, रासायनिक खतांमुळे जमिनीच्या आतली उष्णता वाढली, सर्वच पिकांना ती उपयोगी नसते.
शिवाय कस कमी होत गेला. पावसाच्या पाण्यामुळे या रासायनिक खतांचा अंश पाण्यात मिसळल्याने
पाणी प्रदूषित झाले. आधीच्या काळात शेतकरी आंतरपिके घेई. त्यामुळे जमिनीचा कस टिकायला मदत
होई. जैवविविधता पिक बदलातूनही साध्य होत असे. कारण त्यानुसार निरनिराळे पक्षी – कीटक यांचा
वावर तिथे होई. जी.एम.ओ. बियाण्यांमुळे तर मूळच्या बियाण्यांच्या जातीच नष्ट झाल्या. प्रत्येक वेळी
लागवडीसाठी नवे बियाणे घ्यावे लागणे सुरु झाले. आपली पूर्वापार प्रथा अशी होती की, पिकातला
ठराविक भाग पुढच्या वर्षी बियाणे म्हणून वापरण्यासाठी ठेऊन द्यायचा. पण जी.एम.ओ. बियाण्यांमुळे ती
प्रथा जवळजवळ संपलीच. त्यातलेच एक औद्योगिक शेतीचे खूळ. मैलोन् मैल दूरवर नजर ठरणार नाही
अशी यांत्रिक शेती सुरु झाली. त्यात एकच एक पीक सतत घेत राहिल्याने जमिनीचा कस कमी होत
गेला.(Soil Fertility Decreased) हे सगळे करताना, रासायनिक खतांचे आणि पिकांवर कीड पडली तर
ती मारण्यासाठी म्हणून कीटकनाशकांचे वापर बेसुमार होतच होते. आपल्या अन्नातून ते आपल्याही
शरीरात जातच राहिले आहेत. म्हणजे एकीकडे रसायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे व निकृष्ट
अन्नसेवनामुळे कर्करोग, हृदयरोगासारखे गंभीर आजार वाढले तर त्याच कारणाने आपली मातीही आजारी
पडून नापिक होत गेली…त्याचा परिणाम हवामान बदल, तापमान वाढीतही झालाच. याचाच परिणाम
निसर्गचक्र बदलण्यात झाला आणि शेतकऱ्याच्या तोंडचे पाणी पळू लागले. कीटकनाशक पिऊन तो मृत्यूला
कवटाळू लागला…कधी अवर्षण, कधी अतिवृष्टी, ऋतू अनियमित होणे या रूपांनी आपणच बेभरवशाचा
केलेला निसर्ग …. पाऊस यावा म्हणून साकडे, तो थांबावा म्हणून साकडे …. कुठला देव ऐकणार होता
तुमची विनवणी? आपली चूक आपण सुधारायला घेतली की निसर्ग लगेच हजारो हाताची ओंजळ भरून
आपल्याला देतो, हे आहे नं माहीत? मग ऐकूयात नं त्याची हाक? मातीचे आजारपण घालवणेही आपल्याच
हातात आहे नाही का? मातीतून जे पिकते तेच आपले अन्न, मग ते निवडून घेतल्यावर उरलेले मातीचे
मातीला परत देण्यानेच तिचा कस वाढणार असेल तर आपण थोडे कष्ट घेऊयात नं? सेंद्रिय खत घरोघरी
केले जाऊ लागले तर स्वतःची स्वतःला मदत होणार आहे. भरपूर पोषणमूल्ये असलेले अन्न मिळेल. (लेखक
स्वतः सन २०१६ पासून घरच्या ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत करत आहे.) केवळ ६० वर्षे किंवा दोन
पिढ्याच नव्हे तर पुढच्या अनेक पिढ्यांना आपली धरणीमाता सशक्त ठेऊ शकेल. मातीचे आरोग्य चांगले
राहिले तर पृथ्वीचे आरोग्य चांगले राहील, पर्यायाने आपलेही आरोग्य चांगलेच होत जाईल. शेतकरी
आत्महत्या थांबायला मदत होईल. या आत्महत्यांची जी कारणे आहेत त्यापैकी काही मुख्य कारणे तरी
संपतील.
पिकांवर कसा परिणाम होतो याचे एकच उदाहरण देते. तापमानात १ अंश सेल्सियसने वाढ झाली तर
गव्हाच्या उत्पादनात २१% घट झाल्याचा निष्कर्ष आहे. (कन्सास स्टेट युनिव्हर्सिटी, ३/९/२०१३) तसेच,
भारतातल्या वायू प्रदूषणामुळे १९८० पासून गव्हाचे उत्पादन ५०% नी घटले आहे, हे तुम्हाला माहीत
आहे का?
४०-५० वर्षांपूर्वीच आपले आजी-आजोबा म्हणत असत की, आजच्या अन्नाला पूर्वीसारखी चव राहिली
नाही. आज तर मातीच दिसेनाशी झालीय. मग जी ६० वर्षातच पूर्ण संपून जाण्याच्या बेतात आहे तिला
आजपासून वाचवण्याचा प्रयत्न करणे हा आपला प्राधान्यक्रम असायला हवा, नाही का?
हा लेख लिहिण्यास प्रेरणा ठरलेला एक माहितीपट नुकताच पाहिला. ‘द नीड टू ग्रो’ (‘The Need To
Grow’) हा १ तास ३६ मिनिटांचा माहितीपट प्रत्येकाने जरूर पाहावा असा आहे.. ‘द नीड टू ग्रो’ मध्ये ३
व्यक्तिरेखा जमीन, पिके आणि पोषणमूल्यांचा आग्रह धरण्यासाठीचे आपले प्रयत्न दाखवतात.
एक आठ वर्षांची मुलगी- अॅलिशिया(Alicia) ही शालेय बागा(School Gardens), आणि Seed
Libraries तयार करतानाच कृत्रिम बियाणे विरहित अन्न मिळवण्यासाठी याचिका( Petitions) दाखल
करते.
एरिक कटर (Erik Cutter)हा पुनरुत्पादक शहरी शेती(Regenerative Urban Farming), सेंद्रिय
खत(Composting) आणि पोषणमूल्यांची घनता(Nutrient Density) वाढवण्यासाठीचे प्रयत्न करताना
दिसतो.
तर मायकेल स्मिथ(Michael Smith) हा मातीचा कस वाढवणे(Soil regeneration), बायोचार
(Charcoal produced from plant matter and stored in the soil as a means of removing
carbon dioxide from the atmosphere) आणि सेंद्रिय खते (Organic fertilizers) यासाठी
तंत्रज्ञानाचा वापर कसा करतो हे दाखवले आहे.
आज हवामान बदलामुळे पर्यावरणीय आपत्तीच्या काठावर उभी असलेली पृथ्वी, प्रचंड संख्येने वाढत
असलेले दीर्घकालीन – जुनाट आजार पाहता आपल्या मनात प्रश्न येतोच – मी काय करू शकतो/ते? अशा
वेळी ‘द नीड टू ग्रो’ हा माहितीपट आपल्याला आशेचा किरण दाखवतो. आपल्याला सत्य समजले की
बदलांना सुरुवात होते. मग आपण मातीची हाक ऐकली तरच आपण चांगले जीवन जगू शकू नाही का?”
This is a story of cutting edge solutions to Climate Change. With the planet on the
brink of ecological disaster, with chronic disease rates skyrocketing, many are
wondering… What can I do?
Start watching THE NEED TO GROW. An environmental film that gives the world
hope. Change happens when people know the truth. ( For some context –source –
review of the movie.)
राधिका कुलकर्णी, मुक्तपत्रकार व क्लायमेट रियालिटी लीडर – मेंटॉर (क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट, इंडिया
ब्रँच)
Radhika Kulkarni, Freelance Journalist and a Climate Reality Leader – Mentor (Climate
Reality Project, India Branch)
ML/KA/PGB
5 Jul 2023