वरळी बीडिडी चाळीत पावसामुळे घरात गळती

मुंबई प्रतिनिधी
वरळी बीडीडी चाळींच्या गच्चीवर डांबरीकरण व शालिमार, पॉलिमर प्लास्टर न टाकल्यामुळे जोरदार पडलेल्या पावसामुळे बीडीडी चाळीच्या गच्चीवरून गळती सुरू झाली, त्यामुळे ३ऱ्या मजल्यावरील रहिवाशांना अनेक अडचणींना सामना करावा लागला. तसेच घरटनपावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेक लोकांच्या विविध वस्तूंचे नुकसान झाले.
या पार्श्वभूमीवर आज आमदार आदित्यजी ठाकरे आणि आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वरळीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. ह्या समस्येवर त्वरित तोडगा काढून, रहिवाशांना लवकरात लवकर दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली