लाडकी बहिण आणि बटेंगे तो कटेंगे या घोषणांचा परिणाम

सातारा दि २४– माझी लाडकी बहीण योजना आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिलेली कटेंगे तो बटेंगे या घोषणेमुळे राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालावर परिणाम झालेला दिसून येत आहे मात्र हा लोकांनी दिलेला निर्णय आहे, त्याचा अभ्यास करू आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागू अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे , ते आज कराड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मूळ राष्ट्रवादी काँग्रेस कोणी स्थापन केली याची सर्व लोकांना पूर्ण कल्पना आहे मात्र अजित पवार यांच्या जागा जास्त आल्या हे मान्य करण्यात गैर नाही असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. ओबीसी समाजाबद्दल आमच्या मनात कोणतीही वेगळी भावना नाही असे त्यांनी स्पष्ट करतानाच मराठा ओबीसी यांच्या ध्रुवीकरणाबाबत अधिक खोलावत अधिक खोलात जाऊन अभ्यास करू असे म्हटले आहे .
या निकालाच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा कोणताही विचार नाही असे शरद पवार यांनी यावेळी स्पष्ट केले लोकसभेच्या निकालानंतर जनतेचा आमच्यावर जास्त विश्वास होता असे दिसून आले होते मात्र आता आम्हाला जास्त काम करण्याची आवश्यकता आहे. महाविकास आघाडीच्या सगळ्यांनीच खूप मेहनत घेतली असे पवार पुढे म्हणाले. अजित पवार आणि युगेंद्र यांची तुलना होऊ शकत नाही आमच्यातून बाहेर गेलेल्याना अधिक यश मिळालं आता नव्या जोमानं नवी पिढी घडवावी लागेल असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.