कोल्हापुरात पावसानं पुन्हा जोर पकडला, धरणक्षेत्रात धुवाँधार

कोल्हापूर, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यात पावसाने पुन्हा जोर धरला असून धरण परिसरात धुवाधार पाऊस पडत असल्याने पंचगंगा नदीची पुन्हा धोक्याकडे वाटचाल सुरू आहे यामुळे कोल्हापूरकरांची चिंता वाढली आहे. पुराचं पाणी हळूहळू
वाढू लागलं आहे. दूधगंगा नदी पात्र सलग नवव्या दिवशी धोका पातळी बाहेर वाहत आहे. हातकणंगले, शाहूवाडी, कागल आणि
भुदरगड तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.
राधानगरी, वारणातून विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील 73 बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत . एसटीचे 20 मार्ग बंद झाले तर नऊ राज्य मार्गांसह 43 प्रमुख जिल्हा मार्ग बंद आहेत . काल एका दिवसात 143 मिळकतींची पडझड झाल्यानं सुमारे 52 लाखांचं नुकसान झाले आहे. राधानगरी
धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले असल्याने पंचगंगा नदीच्या पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज सकाळी सात वाजता ४२.४ फूट असलेल्या पातळीने आता धोका पातळीकडे वाटचाल सुरू केली आहे. त्यात
दिवसभरातील
पाऊस पाहता कोल्हापूरकरांची धाकधूक पुन्हा वाढली आहे.
हवामान विभागाने गुरुवार आणि शुक्रवार दोन दिवस कोल्हापूरसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ दिला होता. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस सुरू असून, गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी जोर अधिक आहे. सगळीकडे पुन्हा पाणी पाणी झाले आहे. पुराचं पाणी हळूहळू कमी होऊ लागलं होतं.मात्र पावसाचा जोर वाढल्यानं कोल्हापूरकर महापुराच्या भीतीच्या छायेत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात काल पावसाने पुन्हा जोर पकडला आहे. दिवसभर संततधार सुरु असून पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे.
राधानगरी दूधगंगा सह धरण
क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू आहे. चिकोत्रा धरण 100% भरलं आहे. राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ५ हजार ७८४, वारणातून ११ हजार ५५२, तर दूधगंगेतून ९ हजार १०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं पुराच्या पाण्याची फुग वाढू लागली आहे. दरम्यान, हवामान विभागाने शनिवारपासून जिल्ह्यात दोन दिवस ‘यलो अलर्ट’ दिला असला तरी पाऊस अडचणी वाढवण्याची शक्यता आहे.
ML/ML/PGB
3 Aug 2024