हैदराबादमधील ‘कराची बेकरी’ सापडली वादात

हैदराबाद, दि. ९ : भारत- पाकमधील तणावांमुळे जनमत प्रक्षुब्ध झालेले आहे. यामध्ये आता हैदराबादमधील प्रसिद्ध ब्रॅण्ड ‘कराची बेकरी’ नावावरून वादात सापडली आहे. कराची या पाकिस्तानातील शहराच्या नावाने ही बेकरी आहे त्यामुळे लोकांनी हे नाव बदलण्याची मागणी केली आहे. समाजमाध्यमांवरही या बेकरी मालकांना ट्रोल केले जात आहे.
या विरोधानंतर, मालक राजेश आणि हरीश रामनानी यांनी बेकरीच्या नावाच्या उत्पत्तीबद्दल स्पष्टीकरण दिले. त्यांनी सांगितले की त्यांचे आजोबा, खानचंद रामनानी यांनी 1947 च्या फाळणीनंतर भारतात स्थलांतर केल्यावर 1953 मध्ये कराची बेकरीची स्थापना केली. “73 वर्षे झाली आहेत. फाळणीनंतर भारतात आल्यामुळे आमच्या आजोबांनी कराचीवरून हे नाव ठेवले,” असे त्यांनी सांगितले.
बेकरीच्या मालकांनी प्रशासनाकडून मदतीची मागणी केली आणि त्यांची भारतीय ओळख अधोरेखित केली. “आम्ही मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नावात कोणताही बदल होऊ नये यासाठी मदत करण्याची विनंती करतो. शहरातील बेकरीच्या आऊटलेट्समध्ये लोक तिरंगा फडकवत आहेत,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे जोर देऊन सांगितले, “कृपया आमचे समर्थन करा, कारण आम्ही एक भारतीय ब्रँड आहोत, पाकिस्तानी नाही.”