वाढत्या कबुतरांमुळे पर्यावरण धोक्यात येतं?

मुंबई, दि. 18 (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
महानगरांमधली या पारव्यांची वाढती संख्या हा आता वारंवार उपस्थित केला जाणार प्रश्न झालाय. या पक्षांमुळे निर्माण होणारे आरोग्यविषयक धोके लक्षात घेता पुणे महानगरपालिकेने कबुतरांना खाद्य टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. पारव्यांच्या विष्ठेमुळे आणि पंखांमुळे श्वसनसंस्थेचे संसर्ग होतात. याशिवाय त्वचेवर ॲलर्जी, सायनॅटिस अशा आजारांचा धोका या वाढतो.
पण अशापद्धतीनं कोणत्याही एका जीवाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली, तर त्याचा पर्यावरणावरही परिणाम होतच असतो, असं तज्ज्ञ सांगतात. पारव्यांची वाढलेली संख्या हा पर्यावरणाचा समतोल ढासाळ्याचं लक्षणंही असू शकतं.
ML/ML/PGB
18 Dec 2024