राज्यातील नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच..

 राज्यातील नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनेच..

मुंबई, दि. 3 (एमएमसी न्यूज नेटवर्क):  राज्यातील सर्व प्रकारची नोकर भरती पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने सुरू असून त्यातून सर्व जागा भरल्या जात आहेत, या भरतीत कोणताही गोंधळ नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली, याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. मूळ प्रश्न लहू कानडे यांनी उपस्थित केला होता त्यावर नाना पटोले यांनी उप प्रश्न विचारला होता.

काही वर्तमानपत्रे चुकीच्या महितीच्या आधारे निराधार बातम्या छापत आहेत , या विद्यार्थ्यां मध्ये गोंधळ उडून त्यांची दिशाभूल होत आहे त्यामुळे त्या वर्तमानपत्रांवर हक्कभंग दाखल करावा लागेल असं ते म्हणाले.
कोणत्याही खासगी संस्थांकडून नोकर भरती प्रक्रिया सुरू नसून केवळ आय बी पी एस आणि टी सी एस या नामांकित कंपन्या ही प्रक्रिया राबवित असून त्यात कोणताही गोंधळ नाही असं ही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. Job recruitment in the state is completely transparent.

ML/KA/PGB
3 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *