महाराष्ट्रातच होणार JNPT च्या मुलाखती, गुजरातची जाहीरात रद्द

मुंबई, दि. २७ : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेतून मराठीसाठी मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. तसेच, या पत्रकार परिषदेत JNPT साठी होणाऱ्या नोकरी भरतीच्या मुलाखती ह्या गुजरातमध्ये होणार अशी जाहिरात प्रसिद्ध झाल्याची माहितीही त्यांनी दिली होती. त्यानंतर, मनसे नेते अविनाश जाधव आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जेएनपीटीचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांची भेट घेऊन तात्काळ ही जाहिरात रद्द करुन घेतली. तसेच पुढील सगळ्या मुलाखती महाराष्ट्रात झाल्या पाहिजेत, अशी सक्त ताकीदही मनसेकडून देण्यात आलेली आहे. त्यावर, भविष्यात होणाऱ्या 70 नोकरी भरतीमध्ये सगळी मराठी मुलं असतील अशी ग्वाही जेएनपीटीचे अध्यक्षांनी मनसेला दिली.
मनसेच्या इशाऱ्यानंतर जेएनपीटीच्या अध्यक्षांकडून तशा आशयाचे पत्र देखील राज ठाकरेंना देण्यात आलं आहे. न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल मधील नोकर भरतीबाबत हे पत्र आहे. त्यानुसार, आज २७ जून 2025 रोजी उन्मेष शरद वाघ अध्यक्ष जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधीकरण आणि मनसे नेते अविनाश जाधव ह्यांच्यात झालेल्या चर्चेनंतर न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल यांच्या वतीने गुजरात राज्यात देण्यात आलेली नोकर भरती संदर्भातील जाहिरात रद्द करण्यात आली आहे. न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल कंपनी ही स्थानिक लोकांना रोजगार देणेबाबत नेहमीच आग्रही भूमिका घेत राहिली आहे, आणि या पुढेही घेतल राहील, असे जेएनपीटीच्या पत्रात म्हटले आहे. तसेच, पुढील नोकर भरतीची प्रक्रिया ही न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधीकरण यांच्या चर्चेनी स्थानिक लोकांना सामावून घेणे बाबत राहील, असेही पत्रात नमूद करण्यात आलं आहे.
न्हावाशेवा फ्री पोर्ट टर्मिनल जे. एम. बक्षी अॅड सी.एम ए. टर्मिनल या आपल्या कंपनीने एका इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये नोकर भरती संदर्भात पोर्टमध्ये काम करण्यासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल डिप्लोमा, BE/B.Tech ह्या प्रशिक्षण घेतलेल्या मुलांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. पण संबंधित नोकर भरतीची मुलाखत ही गुजरात राज्यातील मुन्द्रा येथील कार्यालयामध्ये होत आहे. मात्र, या नोकर भरतीचे अर्ज मुलाखती (इंटरव्यू) घेण्यात आल्या आहेत, त्यांना तात्काळ स्थगिती देऊन. उरण जेएनपीटी परिसरातील स्थानिक प्रकल्पग्रस्ताची भरती अर्ज घेण्यासाठी मुदतवाढ देऊन नोकर भरती प्रक्रियाचे अर्ज घेण्यात यावे, अशी मागणी मनसेनं केली आहे.