कवी गुलजार आणि संस्कृत अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ जाहीर

नवी दिल्ली, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्यक्षेत्रातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार आज जाहीर झाला. यंदाच्या 58 व्या ज्ञानपीठ पुरस्कारांची घोषणा झाली असून प्रसिद्ध ज्येष्ठ कवी, चित्रपट निर्माते गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ समितीने एका निवेदनात म्हटले आहे की, ज्ञानपीठ हा पुरस्कार (2023 साठी) दोन भाषांमधील प्रख्यात लेखक, संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यातील लेखक दामोदर मौजो यांना 2022 चा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला होता. गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाल्याने चाहत्यांना आनंद झाला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपला आनंद व्यक्त करत आहेत.
गुलजार यांचं खरं नाव संपूर्णसिंह कालरा असं आहे. भारतातील एक कवी, गीतकार आणि सिनेदिग्दर्शक, निर्माते अशी त्यांची ओळख आहे. लहानपणापासून त्यांना शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली. विशिष्ट शब्दशैलीसाठी ते ओळखले जातात. आनंद, ओंकारा, खामोशी, थोडीसी बेवफाई, दो दूनी चार, बंटी और बबली, सफर अशा अनेक सिनेमांतील गीते त्यांनी लिहिली आहेत. ‘धुआँ’ या कथासंग्रहासाठी 2002 मध्ये त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. 2004 मध्ये पद्मभूषण तर 2013 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे.
जगद्गुरु रामभद्राचार्य हे प्रख्यात विद्वान, शिक्षणतज्ज्ञ, बहुभाषाविद्, रचनाकार, प्रवचनकार, तत्त्वज्ञ व हिंदू धर्मगुरू आहेत. रामभद्राचार्य यांनी 100 पेक्षा अधिक पुस्तके लिहिली आहेत. 22 भाषांचे त्यांना ज्ञान आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांनाही पद्मविभूषणने सन्मानित करण्यात आले आहे. जगद्गुरू रामभद्राचार्य यांना भारत सरकारने 2015 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. चित्रकूटमधील तुलसी पीठाचे संस्थापक आणि प्रमुख रामभद्राचार्य हे प्रसिद्ध हिंदू आध्यात्मिक गुरू, शिक्षक आणि १०० हून अधिक पुस्तकांचे लेखक आहेत. हा पुरस्कार (२०२३ साठी) संस्कृत साहित्यिक जगद्गुरू रामभद्राचार्य आणि प्रसिद्ध उर्दू साहित्यिक गुलजार यांना देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ज्ञानपीठ समितीने एका निवेदनात म्हटले आहे.
SL/KA/SL
17 Feb. 2024