जया बच्चन यांनी संसदेत मागितली माफी

 जया बच्चन यांनी संसदेत मागितली माफी

नवी दिल्ली, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन या परखड वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेकवेळा त्या संसदेत बोलताना विलक्षण संतापल्याचेही पहायला मिळाले आहे. त्यांचा राज्यसभेतील कार्यकाळ आता लवकरच संपणार आहे. मात्र आज संसदेत समारोपाचे भाषण करत असताना त्यांनी भावूक होत माफी मागीतली आहे. “कुणाचंही मन दुखावण्याचा आपला हेतू नव्हता. पण तरीदेखील कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर मी माफी मागते”, असं जया बच्चन सभागृहात म्हणाल्या. मी प्रार्थना करते की, हे सभागृह नेहमी समृद्ध होत राहो. इथे येणाऱ्या दिग्गजांच्या अनुभवाने या सभागृहाची उंची आणखी वाढो”, अशा भावना जया बच्चन यांनी व्यक्त केल्या.

“लोक मला नेहमी प्रश्न विचारतात की, मला इतका राग का येतो? पण तो माझा स्वभाव आहे. मी स्वत:ला नाही बदलू शकत. मला कोणती गोष्ट आवडत नाही किंवा मी त्याल गोष्टीशी सहमत नसेल तर मी माझा स्वत:वरचा ताबा राहत नाही”, अशीही कबुली त्यांनी आपल्या भाषणात दिली.

राज्यसभेच्या 68 सदस्यांचा कार्यकाळ आता संपत आहे. या सदस्यांमध्ये जया बच्चन यांचादेखील समावेश आहे. यावेळी संसेदीत आपल्या शेवटच्या भाषणात जया बच्चन यांनी त्यांच्या 20 वर्षांच्या अनुभवाविषयी भाष्य केलं. “आयुष्यातील 20 वर्ष हा कार्यकाळ खूप मोठा आहे. मला अनेक चांगले-वाईट अनुभव आले. सर्वात चांगला अनुभव हा राहिला की माझं कुटुंब खूप मोठं झालं”, असं जया बच्चन म्हणाल्या.

SL/KA/SL

9 Feb. 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *