राज्यात वन विभागाच्या जटायू ( गिधाड) संवर्धन प्रकल्पाची सुरुवात

 राज्यात वन विभागाच्या जटायू ( गिधाड)  संवर्धन प्रकल्पाची सुरुवात

चंद्रपूर, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यात वन विभागाच्या जटायू ( गिधाड)  संवर्धन प्रकल्पाची सुरुवात झाली आहे. चंद्रपूरच्या ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातल्या बोटेझरी येथे हरियाणा येथून आणलेल्या दहा गिधाडांना निसर्गमुक्त केले गेले. एका मोठ्या पिंजऱ्यात या दहा गिधाडांना इथल्या हवामानाचा सराव होण्यासाठी सध्या मोठ्या पिंजऱ्यात सोडले.

राज्यात गिधाडांची संख्या चिंताजनकरित्या घटल्याने एकूण निसर्ग साखळीतील दुवा कमकुवत झाला होता. हरियाणा येथील पिंजोर इथल्या गिधाड संवर्धन प्रकल्पातून पांढऱ्या पाठीच्या गिधाड प्रजातीची चार वर्षे वयाची गिधाडे ताडोबात सोडून इथे गिधाडांची संख्या वाढविण्यासाठी  प्रयत्न केले जाणार आहेत. अयोध्येतील राम मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने रामायणातील महत्त्वाचे पात्र असलेल्या जटायूच्या संवर्धनासाठी वनविभागाने हे महत्वाचे पाऊल टाकले आहे.

पुढील तीन महिने या मोठ्या पिंजऱ्यात इथल्या हवामानाशी समरस झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष नैसर्गिक अधिवासात सोडले जाणार आहे. महाराष्ट्र वन विभाग या गिधाडांच्या एकूण हालचालीवर आणि दैनंदिनीवर ठेवणार लक्ष ठेवणार आहे.

ML/KA/PGB 21 Jan 2024

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *