जरांगे यांनी सरकारला दिला एक महिन्याचा वेळ, उपोषण स्थगित

जालना, दि. 12 (एमएमसी न्यूज नेटवर्क): मराठा समाजासाठी मी शासनाचे तीन GR नाकारले, तुम्ही माझी भूमिका समजून घ्या,लक्ष देऊन एका मी काय बोलतो ते. आपल्याला १/२ वर्ष टिकणार आरक्षण नको,कायमस्वरूपी हवे. हा मराठ्यांच्या पोरांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे असे सांगत मनोज जरांगे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत देत अनेक अटी घालत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारचे म्हणणं आहे आम्हाला १ महिना द्या, तुम्हाला आयुष्यभर टिकणारे आरक्षण देऊ, मग त्यांना एक महिना देऊया असे आवाहन जरांगे यांनी केल्यावर उपोषणस्थळी उपस्थित समाजाने त्याला पाठिंबा दिला आहे.काल सर्व पक्षीय एक ठराव घेतला आता तुमची वेळ आहे, सगळे एकत्र येऊन माझ्या मराठ्या पोऱ्यांच्या पाठी मागे रहा असे जरांगे म्हणाले.
या आंदोलनात जे गुन्हे दाखल झाले होते ते सगळे सरकार ने मागे घेतले आहेत, 3 अधिकाऱ्यांना सरकारने निलंबित केले. ज्यांनी आपल्या माता भगिनीवर हात उगारला होता आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे.ज्यांनी लाठीमार केला ते सर्व जण आता निलंबित होणार आहेत , तसेच हातात पत्र पडे पर्यंत मी आंदोलन थांबवणार नाही.शेवटच्या माणसाला हे प्रमाणपत्र पडल्याशिवाय मी हे आंदोलन थांबवणार नाही असे जरागे यांनी यावेळी जाहीर केले.
आपल्या तज्ञांचे म्हणणे आहे की प्रक्रियेला वेळ लागतो.सरकारचे म्हणणे तेच आहे, एक महिना द्या आम्ही आरक्षण देतो.तुमचं म्हणणं असेल तर आम्ही उद्या GR काढतो मात्र त्याला जर कोणी आव्हान दिले तर आम्हाला माहिती नाही. जर सरकारने एका दिवसात GR काढला तर मराठ्यांच्या मुलांना परत आरक्षणाला मुकावे लागेल.
आपले 4 -2 वर्ष लढाईत वाया जातील.आपल्या मुलांना आयुष्भराचं आरक्षण मिळाले पाहिजे, एक वर्षाचे दोन वर्षाचे नको अशी भूमिका जरांगे यांनी त्यांच्यासमोर उपस्थित आंदोलकांसमोर मांडली.
जर सगळेच म्हणत असतील तर आपण सरकार ला एक महिना द्यावा.मराठ्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत मी घरी जाणार नाही.आपण सरकारच्या म्हणण्याप्रमाणे आमरण उपोषण बंद करू आणि गावात साखळी उपोषण करू. एक महिन्यानंतर आरक्षण न दिल्यास महाराष्ट्रातील मंत्र्यांना बॉर्डर ओलांडून येऊ देणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
या घातल्या अटी
उग्र आंदोलन करू नका. सगळ्यांनी साखळी उपोषण करा. मी केलं आंदोलन हे झालं जन आंदोलन. मी तुम्हाला शांततेत आरक्षण देतो, काळजी करू नका. काही लोकांना आपले आंदोलन यशस्वी होऊ द्यायचे नाही. मराठ्यांचे वाटोळं करण्यासाठी फौजाच्या फौजा तयार आहेत. एक महिन्याचा वेळ समाजाने सरकारला दिला.अहवाल कसा ही येऊ सरकारने तिसऱ्या दिवशी पत्र वाटायला सुरुवात करायची.
महाराष्ट्रात जेवढे गुन्हे दाखल झाले तेवढे मागे घ्यायचे. अंगावर हात टाकणाऱ्यांना निलंबित करावे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळे मंत्रिमंडळ, श्रीमंत छत्रपती उदयन राजे यांनी इथे आले पाहिजे सरकारच्या वतीने हे आम्हाला लिहून दिले पाहिजे अशा अटी मनोज जरांगे यांनी यावेळी घातल्या.
12 ऑक्टोंबर रोजी विराट सभा घ्यायची, पाच मागण्याबाबत सरकारने लेखी वेळापत्रक द्यावे.
भारतात मराठ्यांचे नाव घेतलं की थरकाप उडायला पाहिजे. उदयन राजे, संभाजी राजे, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्री इथे यावेत आरक्षण मिळेपर्यंत मी माझ्या लेकरांचे तोंड महिना भर बघणार नाही असंही जरांगे यांनी जाहीर केले.
ML/KA/PGB
12 Sep 2023