जालन्यात बस-टेम्पोच्या भीषण अपघातात सहा ठार, १८ जखमी

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना वडीगोद्री मार्गावारील शहापूर येथे शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस व मोसंबी भरुन येणाऱ्या ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला. अपघातात ६ जण ठार तर १८ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. काही नागरिक गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
महामंडळाची बस बीड जिल्ह्यातील गेवराई येथून जालन्याकडे जात होती तर टेम्पो हा जालन्याहून बीडकडे मोसंबी घेऊन जात होता. भरधाव वेगाने येणारा आयशर ट्रक हा त्याच्या समोरील दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात होता. यावेळी समोरून येणाऱ्या बसवर हा ट्रक जाऊन आदळला. या बसमध्ये एकूण २४ प्रवाशी होते. यातील किरकोळ जखमींना अंबड येथील प्राथमिक आरोग्यकेंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
TR/ML/PGB
20 Sep 2024