मुंबई खरंच बुडणार आहे का ?

मुंबई, दि. 21 (एमएमसी न्यूज नेटवर्क): “येत्या तीसेक वर्षात मुंबई बुडणार म्हणे? खरंच?”Really, Mumbai is going to sink in next 30 years?
“हो.” Yes.
“कशी काय?”How so?
“अमेरिकेने दुसऱ्यामहायुद्धात हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब टाकले, त्याचे परिणाम अजूनही नष्ट झालेले नाहीत.” The effects of the US dropped an atomic bomb on Hiroshima – Nagasaki in WWII have not yet waned.
“हो, पण त्याचा इथे काय संबंध?” Yeah, but what does that have to do with it?
“ऐका. आज पृथ्वीवर मानव किती उष्णता निर्माण करतोय माहीत आहे? दरवर्षी दररोज ६ लाख अणुबॉम्ब फुटल्यावर जेवढी उष्णता निर्माण होईल तेवढी!!! गेल्या वर्षीपर्यंत रोज ५ लाख अणुबॉम्ब फुटल्यावर निर्माण होणाऱ्या उष्णतेएवढी तीव्रता होती. यावर्षी म्हणजे सहाच महिन्यात ती ६ लाख अणुबॉम्ब फुटण्याइतक्या तीव्रतेवर गेली आहे! MAN IS GENERATING AS MUCH HEAT AS 6 MILLION ATOMIC BOMBS EXPLODED EVERY DAY, EVERY YEAR.
हवामानच बदलले आहे. आपण काय करू शकतो, असे म्हणू नका. मानवनिर्मित उष्णतेमुळेच हे घडते आहे हे लक्षात घ्या. याची दोन प्रमुख कारणे म्हणजे बेसुमार जंगलतोड आणि अफाट प्रमाणात जीवाष्म इंधने मानव जाळतो आहे. त्यात अनावश्यक वीजवापर, चारचाकी गाड्यांमधून प्रवास, विमान प्रवास, औद्योगिकीकरण, इत्यादींसाठी लागणाऱ्या इंधनांचा समावेश होतो. तसेच पायाभूत सोयीसुविधांच्या नावाखाली विचार न करता केलेली जंगलतोड या आणि इतर अनेक कारणांमुळे हरितगृह वायूंचे वातावरणातील प्रमाण प्रचंड वाढले आहे. यातल्या प्रदूषणकारी वायूंपैकी कर्बवायू वातावरणात हजार वर्षे राहतो(झाडे तोडल्यावर कर्बवायू कोण शोषून घेणार?), मिथेन काही दशके तर नायट्रस ऑक्साइड अंदाजे १०० वर्षे राहतो. मानव रोजच या प्रदूषणात भर घालत आहे. हजारो हेक्टर जंगलतोड स्वतःच्या ‘तथाकथित प्रगती’ साठी करत आहे. परिणामी, सूर्यापासून निघणारे घातक किरण शोषून घेण्याची पृथ्वीची क्षमता मंदावली आहे. आर्क्टिक (उत्तर धृव) आणि अंटार्क्टिक क्षेत्रावरची (दक्षिण धृव)बर्फ वितळण्याची क्रिया वेगाने घडत आहे. त्यामुळे समुद्रांची पातळी आणि उष्णता सतत वाढत आहे. मानवाच्या याच चुकीच्या जीवनशैलीमुळे ९३% उष्णता समुद्रात जाते. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची आम्लता ३०% नी वाढली आहे. सजीवांच्या जाती लुप्त होऊ लागल्या आहेत. कृषी उत्पादने घटत आहेत. एवढेच नव्हे तर शिंपल्याचा रंग आणि पोत किती बदलला आहे हे लक्षात आलेय तुमच्या? ही आणि अशा अनेक गोष्टी मानवाला भूषणास्पद नाहीत. EXCESSIVE USE OF FOSSIL FUELS AND DEFORESTATION FOR ‘SO CALLED’ HUMAN DEVELOPMENT / CAUSES MELTING ICE ON NORTH AND SOUTH POLES/ SEA LEVEL RISE/ MAN MADE HEAT HAS SLOWED DOWN THE EARTH’S ABILITY TO ABSORB HARMFUL RADIATION FROM THE SUN.
आता लक्षात घ्या की, पृथ्वीचा ७०% भाग पाण्याने वेढलेला असताना हे सगळे महासागर, समुद्र, उपसागर इत्यादी जलस्रोत मानवनिर्मित उष्णतेला किती काळ तोंड देऊ शकतील? त्यातल्या जलचर- सजीवांचे काय होईल? अखंड पृथ्वीवरची जैवविविधता मानव आपल्या तथाकथित विकासाच्या नावाखाली पणाला लावत असेल तर समुद्रकिनारी, नदीकिनारी किंवा मोठमोठ्या जलाशयांशेजारी वसलेली शहरे मानवच धोक्यात आणत नाहीये का? जास्त तापलेली हवा वातावरणाच्या वरच्या भागात जाते. त्यामुळे जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होते त्यातून वादळे, चक्रीवादळे येतात. अशा नैसर्गिक आपत्तींची मालिका आठवून बघा. पूर्वी काही वर्षांनी येणाऱ्या या चक्रीवादळे वा त्सुनामीची वारंवारिता वाढू लागल्याचे जाणवले असेल. पूर्वी काही दिवस आधी या आपत्तींची सूचना देणे शक्य असे. आता वेग इतका वाढलाय की जेमतेम २४ तासांची पूर्वसूचना मिळवता येते. पूर्वी या वादळी वाऱ्यांचा वेग ताशी १०० कि.मी. च्या आसपास असे. अम्फन वादळाच्या वेळी हाच वेग ताशी २६० कि.मी. वर गेलेला दिसला. बरे, वादळ आले आणि गेले, इतकी साधी नैसर्गिक घटना ठरते का ही? प्रचंड उंचीच्या लाटा आपल्या वाटेत येणाऱ्या प्रत्येकाला गिळंकृत करण्याचा प्रयत्न करतात. त्या लाटांबरोबर समुद्री जीव-लहानमोठे मासे किनारा ओलांडून पलीकडे जातात. वादळाचा वेग कमी झाला की या लाटा परत जातात आणि लाटांबरोबर परतू न शकलेले हे मासे व इतर जलचर जमिनीवर मरून पडतात. त्यामुळे घाण, दुर्गंधी आणि साथीचे रोग-आजारांना निमंत्रण देणारी परिस्थिती तयार होते. पण याच लाटा जाताना त्या शहरातील, गावातील मानवनिर्मित कचरा त्यांच्याबरोबर समुद्रात वा त्या जलाशयात वाहून नेतात. जलप्रदूषण होते आणि त्यामुळे जलचरांचे अस्तित्व धोक्यात येते. समुद्र किनारपट्टीच्या जवळ वसलेल्या सगळ्या शहर, गाव, वाड्या-वस्त्यांना असलेला हा धोका दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. STORMS, CYCLONES, HURRICANES, TYPHOONS. AQUATIC ENDANGERED/ INCREASING RATE OF CONTAGIOUS DISEASES/ RISING TEMPERATURE OF EARTH.
समुद्रकिनारी असलेल्या शहरांची परिस्थिती मुंबईकरांना नव्याने सांगायची गरज नाही. पण औद्योगिक क्षेत्र निर्मितीतून निर्माण होणाऱ्या रोजगारांच्या संधी आणि त्यातून खेड्यांकडून या शहरांकडे स्थलांतरित होत असलेली प्रचंड मोठी लोकसंख्या हा त्या शहरांसाठी चिंतेचाही विषय आहे. सगळ्यांसाठी राहण्याच्या, प्रवासाच्या, वाहतुकीच्या वा अन्य अशा मूलभूत सोयीसुविधा निर्माण करण्याचा येणारा ताण, तसेच राहण्यासाठी किंवा कारखानदारीसाठी होणारी प्रचंड प्रमाणातली जंगलतोड!!! कुठे जात आहोत आपण? काय साध्य करायचे आहे आपल्याला? हे धोके मानवाने स्वतः आपल्यावर ओढवून घेतले आहेत. शहरीकरण होताना किंवा कुठलेही गाव, वाडी वसताना आपण नैसर्गिक प्रारुपांना धक्का न लावता, त्यांना सामावून घेणारे बांधकाम केले का? निसर्गाबद्दल आपण संवेदनशील आहोत का? याबाबत राजकारणी आणि प्रशासनाने आपल्याला सतत निराश केले आहे. राजकारणी लोकांना निवडून देताना, निसर्गाला जपणारी व्यक्ती आपण निवडून देत आहोत का, याचा विचार सामान्य माणूस करू लागेल तेव्हाच बदल शक्य होईल. त्याचबरोबर प्रशासनातील व्यक्तींनो, तुम्हीही, निसर्गाचा आदर करणारे निर्णय घेतलेत तरच तुमच्या-आमच्या मुलाबाळांना समृद्ध आयुष्य जगता येणार आहे हे लक्षात घ्यावे, इतकीच अपेक्षा. आज निसर्गाला डावलणारे दिसतात. त्याचा विनाश करणारे दिसतात आणि अशांपुढे लाचार, मिंधे लोक दिसतात म्हणून समुद्रकिनारच्या शहरांची दुर्दशा आणि त्यांचे सन २०५० सालाच्या आसपास बुडणे हा भविष्यातला धोका समोर आहे. केवळ मुंबईच बुडणार असे नाही तर जगातल्या समुद्र किनाऱ्याजवळच्या अनेक शहरांना ती बुडण्याचा धोका अटळ झाला आहे. म्हणूनच आपण राहतो त्या ठिकाणाची काळजी आपणच घ्यायची आहे. पृथ्वीवर सतत वाढणारे तापमान आपण आटोक्यात आणले नाही तर मुंबईच नव्हे, तर अखिल मानवजातच सन २०५० पर्यंत किती शिल्लक राहील हाही प्रश्न अभ्यासकांना पडला आहे. WHERE ARE WE GOING? ARE WE SENSITIVE TO NATURE? IS MANKIND IN DANGER AROUND 2050?
‘मुंबई बुडणार?’ हेच शीर्षक का? तर, पावसाळा सुरु होण्याआधीच मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसात नालेसफाई प्रामाणिकपणे न केल्याने रेल्वे रूळांवर आणि उपनगरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने जी काही दाणादाण उडाली ती अनुभवलीच! निसर्गाचा आदर न करणारे आणि विकास नियमांना विट्टीप्रमाणे कोलून टाकणारे काही प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी या भूमीला सहन करावे लागत आहेत हे गेली अनेक वर्षे मुंबईकर बघतोच आहे. अन्यथा ३० वर्षे मुंबई महानगरपालिकेची सत्ता एकाच पक्षाकडे असूनही ही परिस्थिती आली नसती. वेळीच जागे झालो नाहीत तर मुंबई कुणाची हा प्रश्न विचारायलाही कुणी शिल्लक नसेल हे लक्षात घेणे गरजेचे आहे. INSENSITIVE POLITICIANS AND ADMINISTRATORS / IT IS A WAKE UP CALL FOR EVERYONE! RESPECT NATURE.
मुंबई बुडू द्यायची की तिला वाचवायची हे आपणच ठरवणार आहोत.” WHETHER TO SAVE MUMBAI OR NOT? DECIDE…
राधिका कुलकर्णी, मुक्तपत्रकार व क्लायमेट रियालिटी लीडर – मेंटॉर (क्लायमेट रियालिटी प्रोजेक्ट, इंडिया ब्रँच)
Radhika Kulkarni, Freelance Journalist and a Climate Reality Leader – Mentor (Climate Reality Project, India Branch)
ML/KA/PGB
21 June 2023