आय एन एस विक्रांत निधी प्रकरणी न्यायालयात जाणार

कोल्हापूर, दि. 1 (एमएमसी न्यूज नेटवर्क): कसब्याची जागा मुळात आमच्याकडे नव्हतीच. ती जागा ३०-३५ वर्षं भाजपाकडे होती. मात्र, यंदा ती भाजपाकडून जाते आहे. पिंपरीची जागा कोण जिंकेल, सांगता येत नाही. पण हा सुद्धा एकप्रकारे भाजपाचा पराभव आहे, असं मत उध्दव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज कोल्हापुरात व्यक्त केलं.
शिवगर्जना यात्रेच्या निमित्तानं संजय राऊत कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरून राज्य सरकारवर टीकास्र सोडलं.
INS विक्रांतच्या नावाखाली किरीट सोमय्यांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. हे पैसे कुठं गेले याचा शेवटपर्यंत शोध लागला नाही. या प्रकरणाचा तपास याच तपासयंत्रणांकडून सुरू होता. मात्र, सरकार बदलताच या चोरांना क्लिनचीट देण्यात आली, असा आरोप संजय राऊत यांनी केला. INS Vikrant to go to court in Nidhi case
यासंदर्भात आपण स्वत: न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचंही संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं.
ML/KA/PGB
1 Mar. 2023